शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भाजपवरील खोट्या आरोपांबाद्दल नवाब मलिक यांनी जनतेची माफी मागावी; प्रसाद लाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:35 IST

भाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाड

ठळक मुद्देभाजपकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा पुरवठा राज्य सरकारमार्फतच केला जाणार होता : प्रसाद लाडरेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यानं जनतेला त्रास, लाड यांचं वक्तव्य

"दमण येथील ब्रुक फार्मा कंपनीतील 'रेमडेसिवीर'चा साठा भारतीय जनता पार्टीचे नेते राज्य सरकारच्याच ताब्यात देणार होते असा खुलासा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केल्याने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा खोटेपणा उघड झाला आहे. या खोटेपणाबद्दल मलिक यांनी महाराष्ट्राची माफी मागावी आणि राष्ट्रवादी चे प्रमुख शरद पवार यांनी खोटे आरोप करणाऱ्या मलिक यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मंगळवारी केली. रेमडेसिवीर औषधांच्या साठेबाजीची सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणीही लाड यांनी यावेळी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   "भाजपकडून जो ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा राज्य सरकारच्या मार्फतच केला जाणार होता असे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री शिंगणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे. नवाब मलिक यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार व भाजपाच्या नेत्यांविरूद्ध जे आरोप केले, ज्या अफवा पसरवल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागावी," असं लाड यावेळी म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या मागणीला पाठिंबा  राज्यामध्ये रेमडेसिवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार झाला आहे. राज्य सरकारला हा काळाबाजार रोखता आला नसल्याने  जनतेची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे या औषधाच्या साठेबाजीची  व काळ्याबाजारातील विक्रीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचंही लाड यांनी नमूद केलं. "राज्य सरकारच्या विविध यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा स्तरावरील यंत्रणांना रेमडिसीवरचा काळाबाजार रोखता आलेला नाही. आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी  एनआयए अथवा सीबीआय मार्फत  या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. चव्हाण यांच्या या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा आहे. अशी चौकशी झाल्यास या प्रकरणातले सत्य बाहेर येईल," असं त्यांनी नमूद केलं.भाजप राज्य सरकारमार्फतच मदत करणार"भारतीय जनता पक्षानं  संकटाच्या काळात नेहमी जनतेच्या कल्याणाचा विचार केला. भाजपाकडून औषधांची जी मदत केली जाणार आहे ती राज्य सरकारच्या मार्फतच केली जाणार आहे. परस्पर नाही.  राष्ट्रवादीच्या आमदारांनी पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या औषधांचा पुरवठा केला. स्थानिक पातळीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून परस्पर औषधांचा पुरवठा केला आहे. मग हा औषधांचा साठा कुठून आला? या लोकप्रतिनिधींना औषधे पुरवण्याची परवानगी कोणी दिली?," असा सवालही लाड यांनी केला.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPrasad Ladप्रसाद लाडnawab malikनवाब मलिकBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीSharad Pawarशरद पवार