शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी IAS, IPS अधिकारी फडणवीसांना भेटतात; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 15:12 IST

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस आणि केंद्रातील काही मंत्र्यासोबत बैठका झाल्यानंतरच आरोपांची सुरूवात झाली आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी हे ठरवून कटकारस्थान केले जात आहे.

मुंबई - राज्य सरकारवर आरोप करण्यापूर्वी काही आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बैठका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाल्या होत्या. भाजपकडून हे कटकारस्थान ठरवून केले जात आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एवढेच नाही तर, वेळ आली की, आरोप करण्यापूर्वी कोण-कोणते आयपीएस अधिकारी आणि विरोधीपक्ष नेते कुठे आणि कसे भेटले, याचीही माहिती देऊ, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्या या आरोपामुळे, राज्यातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीनंतरच आरोपांना सुरुवात -माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस आणि केंद्रातील काही मंत्र्यासोबत बैठका झाल्यानंतरच आरोपांची सुरूवात झाली आहे. विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि अडचणीत आणण्यासाठी हे ठरवून कटकारस्थान केले जात आहे. हा नियोजित कार्यक्रम आहे. या देशातील संस्थांचा राजकीय वापर होत असल्याचेही आता लपून राहिले नाही. ईडी असो अथवा सीबीआय, यांच्या कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे आम्हाला बदनाम करण्यासाठी जेवढ्या ताकतीने प्रयत्न करतील, त्यांना जनता निश्चितपणे उत्तर देईल, असेही मलिक म्हणाले.

ठरवून कटकारस्थान -केंद्रातील भाजप सरकार जेथे-जेथे विरोधी पक्षाची सरकार आहे. तेथे-तेथे त्या सरकारांना बदनाम करण्यासाठी, त्यांच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी कट कारस्थान रचत आहे. बंगालमध्ये अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही तसेच सुरू आहे. अनिल देशमुख, भावना गवळी, संजय राऊत, अनिल परब यांनाही राजकीय हेतूने टार्गेट केले जात आहे. कुणी अधिकारी भ्रष्ट असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने सर्व विषय राजकीय हेतूने जोडण्यात येत आहेत. हे सर्व भाजपचे कटकारस्थान आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

मलिक यांच्या आरोपात तथ्य नाही - भाजपयासंदर्भात बोलताना, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांचा आरोप फेटाळून लावत देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत कामानिमित्त अधिकारी माजी मुख्यमंत्री अथवा विरोधी पक्षनेत्यांना भेटूत शकतात. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढणे योग्य नाही, असे म्हटले आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस