शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

देशमुखांपाठोपाठ मलिक यांना अटक; पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:23 IST

राष्ट्रवादीला दुसरा धक्का; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक अटकेत

मुंबई: राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचलनालयानं अटक केली आहे. मलिक यांना पहाटे ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर तब्बल ८ तास त्यांची चौकशी झाली. यानंतर ईडीनं त्यांना अटक केली. मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मलिक यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे.

अजित पवारांच्या दालनात बैठक सुरूनवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक सुरू आहे. मंत्रालयात सुरू असलेल्या या बैठकीला दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहेत. 

मलिक राजीनामा देणार?ईडीच्या अटकेत असलेले नवाब मलिक राजीनामा देण्याची शक्यता आहे. एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. याआधी ईडीच्या कारवाईमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे विरोधकांनी दबाव आणण्याआधीच मलिक राजीनामा देतील अशी शक्यता आहे. मलिक त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठवू शकतात.

मलिक यांनी राजीनामा द्यावा- पाटीलभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदी राहण्याचा कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असलेले उद्धव ठाकरे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते या प्रकरणी भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख