शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:58 IST

Boat Capsized In Raigad: रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ बुडल्याची दुर्घटना घडली.

रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ बुडल्याची दुर्घटना घडली. या बोटीवरील आठ खलाशांपैकी पाच जणांनी तब्बल नऊ तास पोहत अलिबागमधील सासवणे समुद्रकिनारा गाठून आपला जीव गाठला. तर, उर्वरित तीन खलाशी अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई ही बोट सकाळी सात वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेली. मात्र, सुमारे साडेआठच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात जोरदार लाटा उसळल्या. या लाटांच्या तीव्र धक्क्यामुळे बोट डगमगली आणि काही क्षणांतच उलटून समुद्रात बुडाली. 

३ जण अजूनही बेपत्ताहेमंत बळीराम गावंड (वय, ४५), संदीप तुकाराम कोळी (वय, ३८), रोशन भगवान कोळी ( वय, ३९), शंकर हिरा भोईर (वय, ६४) आणि कृष्णा राम भोईर ( वय, ५५) यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. तर, नरेश राम शेलार, धीरज कोळी, मुकेश यशवंत पाटील हे खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.  तटरक्षक दल, स्थानिक मच्छीमार आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बेपत्ता खलाशांचा शोध घेत आहेत.

पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरूहेमंत, संदीप, रोशन, शंकर आणि कृष्णा यांना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावरील परिसरात खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र