शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

"शिवप्रेमींना आवडले नाही पण...", प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' कृतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:41 IST

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर वाहिलेल्या फुलांमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी असली तर तो प्रत्येकाचा अधिकार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.

राज्यात औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्यावरून आणि स्टेटस ठेवल्यावरून वाद चिघळला असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहिली. आंबेडकरांच्या या कृतीमुळे शिवप्रेमी नाराज असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. तसेच आपण महाराष्ट्रात अनेक वर्षे राहिलो आहोत, महाराष्ट्रातील जनतेच्या मनात याबद्दल काय आहे हे सर्वांना माहिती असल्याचे अजित पवारांनी नमूद केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबच्या कबरीवर वाहिलेल्या फुलांमुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी असली तर तो प्रत्येकाचा अधिकार आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. औरंगजेबबद्दल आपले मत काय आहे हे सर्वांना माहिती आहे कारण आपण महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालो आहोत. प्रकाश आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानाने आपल्याला कुठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. पण ज्यानं त्यानं ठरवायचं आहे की कुठे जायचं", असेही अजित पवारांनी सांगितले. 

भारत राष्ट्र समिती पक्षाच्या सभांबद्दल अजित पवारांनी सांगितले की, वेगवेगळे राजकीय पक्ष देशातील कुठल्याही भागात जाऊन ते आपला पक्ष वाढवू शकतात. चंद्रशेखर राव हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना वाटते की महाराष्ट्रात देखील आपला पक्ष वाढवण्यासाठी पाय रोवावेत. या आधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना मायावती यांनी देखील असा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांना फारसे यश आले नाही. मुलायम सिंह यादव देखील मुख्यमंत्री असताना त्यांनीही प्रयत्न केला पण त्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित राव यांचा राष्ट्रीय नेता होण्याचा मानस असेल. पण त्यांना वाटते की, आपण एका राज्याचे मुख्यमंत्री आहोत म्हणून दुसऱ्या राज्यांने आम्हाला निवडून द्यावे, पण त्यांच्या पक्षाचे इथे काम कोण पाहणार? असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.   

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती