शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

भारतीय सैन्य हे विविधतेत एकतेचे जिवंत उदाहरण : प्रकाशसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:46 PM

नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जेव्हा सैन्यात भरती होतात तेव्हा त्यांच्यासाठी भारत देश हाच एकमेव धर्म असतो़ भारतीय सैन्यदल हे विविधतेत एकता असलेले एकमेव जिवंत उदाहरण असून देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याची वेळ आली तरी सैनिकाच्या मनात यत्किंचितही शंका येत नसल्याचे प्रतिपादन मेजर जनरल पी़पी़प्रकाशसिंह यांनी केले़

ठळक मुद्देआर्टिलरी सेंटर : शपथविधी सोहळा४१७ जवान देशसेवेसाठी सज्ज

नाशिक : भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासात तोफखाना (रेजिमेंट आॅफ आर्टिलरी) विभागातील महावीर जवानांनी मोलाची भर घातलेली असून देशाच्या सीमा, प्रतिष्ठा व दबदबा कायम ठेवल्या आहेत़ देशाच्या वेगवेगळे राज्यातून आलेले विविध धर्माचे व बोलीभाषा असलेले तरुण जेव्हा सैन्यात भरती होतात तेव्हा त्यांच्यासाठी भारत देश हाच एकमेव धर्म असतो़ भारतीय सैन्यदल हे विविधतेत एकता असलेले एकमेव जिवंत उदाहरण असून देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याची वेळ आली तरी सैनिकाच्या मनात यत्किंचितही शंका येत नसल्याचे प्रतिपादन मेजर जनरल पी़पी़प्रकाशसिंह यांनी केले़

देशातील सर्वात मोठ्या नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर गुरुवारी (दि.२३) झालेल्या शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून मेजर प्रकाशसिंह बोलत होते़ सैनिकी जीवनात शिक्षण ही निरंतन प्रक्रिया असून नवीन गोष्टी आत्मसात करून आपले सामर्थ्य वाढविण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवा़ आगामी काळात तोफखाना विभागाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण असून आपल्या प्रशिक्षणात सातत्य ठेवून प्राप्त झालेल्या सैनिकी कौशल्याचा देशसेवेसाठी परिपुर्ण वापर करा, देशासाठी सर्वोच्च बलीदान देण्याचे भाग्य प्रत्येकाला मिळत नसल्याचे मार्गदर्शनात प्रकाशसिंह यांनी सांगितले़

तोफखाना केंद्रातील सैन्यदलात भरती झालेल्या ४१७ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने ४२ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. जवानांची ही तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्यदलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या चार तुकड्यांचे लष्करी थाटात कवायत मैदानावर आगमन झाले. दरम्यान, प्रकाशसिंह हे सलामी मंचावर येताच ग्रुप कमांडर बी़मंजूनाथसह जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकडीने लष्करी बॅण्डच्या तालावर सशस्त्र संचलन केले तर चेतक हेलिकॉप्टरनेही यावेळी सलामी दिली़ यावेळी जवानांनी १९६३ मध्ये भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेल्या रशियन बनावटीच्या १३० एमएम तोफेचे प्रात्यक्षिक करून दाखविले़ या तोफेने १९६५, १९७१ व १९९९ च्या युद्धात विशेष योगदान दिले आहे़ समीक्षक अधिकारी प्रकाशसिंह यांनी जवानांना ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी शपथ दिली़

(सर्व छायाचित्रे : राजू ठाकरे)