शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

नाशिक गारठले; कसबे सुकेणेत दवबिंदू गोठले !

By admin | Updated: January 28, 2016 01:27 IST

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमान कमी झाले असून, थंडी वाढली आहे. नाशिकला हुडहुडी भरली असून, निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे

नाशिक/मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील किमान तापमान कमी झाले असून, थंडी वाढली आहे. नाशिकला हुडहुडी भरली असून, निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे ३.२, तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर ५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. दरम्यान, नानासाहेब भंडारे यांच्या शेतातील पुदिन्यावरील दवबिंदू गोठून त्याचे रूपांतर बर्फात झाले होते. बुधवारी नाशिकचे तापमान ६.४ नोंदवण्यात आले, तर मुंबईही थंडच असून, किमान तापमान १६ अंशावर स्थिर आहे.कसबे-सुकेणे गोदावरी-बाणगंगा-कादवा या नदी खोऱ्यात असल्याने या भागात तापमान नेहमीच कमी असते. सन २०१२ या वर्षी कुंदेवाडी येथील केंद्रावर ०.०२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. त्या वेळीही दवबिंदू गोठून बर्फात रूपांतर झाले होते. राज्यात ३१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहणार असून, किमान व कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. बुधवारी कोकणातील हवामानात ३ ते ५ अंशांची घट झाली आहे. कोकण, विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून, मध्य महाराष्ट्रातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. जळगाव येथे तब्बल साडेपाच अंशांनी घट होऊन, ७ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. नांदेड येथे ही ३ अंशांनी घट होऊन, १०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. (प्रतिनिधी)किमान तापमान : पुणे ११.२, लोहगाव १२.९, अहमदनगर ९.८, जळगाव ७, महाबळेश्वर १५.२, मालेगाव ९.४, नाशिक ६.४, सांगली १६, सातारा १३.१, सोलापूर १७, अलिबाग १६.४, रत्नागिरी १५.१, उस्मानाबाद १४.४, औरंगाबाद १२.३, परभणी १४.१, नांदेड १०.५, अकोला १२, अमरावती १२.८, बुलडाणा १५, चंद्रपूर १७.९, गोंदिया १५.३, नागपूर १३.३, वाशिम १५.४, वर्धा १४.५, यवतमाळ १४.