शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाणार नाही लादणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:31 AM

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांनाविश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नाणारवर चर्चा सुरू झाल्यानतंर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी ही लक्षवेधी पुढे ढकलण्याची सूचना केली. त्यावरून एकच गोंधळ झाला.अखेर स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, नवीन रिफायनरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.त्यामुळे प्रदूषण होत नाही. अनेक देशात आधुनिक तंत्राचा वापर करून रिफायनरी उभारल्या जात आहे. राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी शासनाने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना यांना प्रदूषण व अन्य बाबींविषयी शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यास तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यास आयआयटी मुंबई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केलेली आहे. यांची अहवाल मिळाल्यावर व स्थानिक जनतेच्या शंका दूर झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करणार नाही. प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन शेतकऱ्यांनी देऊ केली आहे. त्यामुळे नाणारला शंभर टक्के शेतकºयांचा विरोध आहे, असे म्हणता येणार नाही. शिवसेनेचे मौननाणार प्रकल्पासाठी रस्त्यावर आणि सभागृहाच्या बाहेर विरोध करणाºया शिवसेनेने विधान परिषदेत मात्र मौनस्वीकारणे पसंत केले. विरोधकांनी अनेक प्रश्न विचारूनही नाणार प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया रद्द करण्याची अधिसूचना काढणारे शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई गप्प होते. यावरून शिवसेनेची सभागृहाबाहेरआणि सभागृहातील नाणारविषयीची भूमिका वेगवेगळी असल्याची टीका विरोधकांनी केली. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस