शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:52 IST

Nana Patole on CM Oath: भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असे म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला आले होते असे म्हणत कोत्या मनाची मानसिकता अशी टीका केली आहे. यातच आता नाना पटोले यांनी मोठा दावा केला आहे. 

आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं असतं तर गेलो असतो. निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. निरोप असता तर गेलो असतो, असे पटोले म्हणाले. तसेच आम्हाला कधीच बोलावले नाही असे सांगत माझे मित्र सीएम झाले त्यांना शुभेच्छा आहेत. आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, असे पटोले म्हणाले. 

कंत्राटी भरती आम्ही बंद करू, असे फडणवीस म्हणाले होते. आता शिक्षकांची कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. ग्रामीण भागात बस जात नाही. ग्रामीण भागात एसटी सेवा बंद करत आहे का? असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी, फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे, गृह विभाग त्यांच्याकडेच राहील अशी आमची अपेक्षा आहे, महाराष्ट्र ड्रग मुक्त करावे, अशी मागणी पटोले यांनी केली. 

शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात. मात्र यावेळेला यांनीच घोषणा केली, भाजप आणि त्यांचे सोबती हे संविधानापलीकडचे लोक आहेत असा टोला पटोले यांनी लगावला. महायुतीच्या भांडणात आम्हाला जायचे नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या हे आमचे उद्दिष्ट आहे. काहींचे चेहरे हसरे आहेत, काहींचे चेहरे पडले आहेत. ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षांचा नाही. आता संपूर्ण देशात ईव्हीएचा घोळ चर्चेचा विषय झाला आहे. मारकरवाडीने सरकारच्या मनात लपलेला मतं चोरणारा डाकू सर्वांसमोर आणला आहे, अशी टीका पटोले यांनी केली. 

काँग्रेस गट नेता, प्रतोद निवडीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे आमचे पत्र देणार आहोत. ही आमची परंपरा आहे आणि आता जे सत्तापक्षावर बसले आहे, त्यांचे तरी निर्णय कुठे झाले आहेत? एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे स्वतंत्र पक्ष होते पण त्यांचा निर्णय कुठे झाला आहे, असा सवाल पटोले यांनी केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४