शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, इतरांची काळजी करु नये”; काँग्रेसची ठाकरे गटावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 13:09 IST

Maharashtra News: सत्तेत असून आपला पक्ष ज्यांना नीट सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, असा पलटवार नाना पटोले यांनी ठाकरे गटावर केला.

Maharashtra Politics: राज्यातील अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून, अंतर्गत धुसपूस वाढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे गटातील नेत्याच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे. ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांची काळजी करु नये, अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याबाबत विधान केले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात. हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते. हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे. फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते सध्या शांत आहेत, असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. यानंतर नाना पटोले यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. 

दुसऱ्यांच्या पक्षाची काळजी करण्याची गरज नाही

प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत. त्यांना दुसऱ्यांच्या पक्षाबाबत बोलायचे काही कारण नाही. सत्तेत असून आपला पक्ष ज्यांना नीट सांभाळता आला नाही, त्यांनी इतरांच्या पक्षाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पक्षात पाहावे, या शब्दांत नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, तोडोवाल्यांचा जोडोशी काय संबंध? त्यांच्याबद्दल फारसे बोलणे योग्य नाही. भारत जोडो यात्रेचा परिणाम उलटा पाहायला मिळत असल्याची टीका भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. यावर बोलताना, राज्यामध्ये हुकूमशाहीचे सरकार आहे. लोकशाहीला न मानणारे सरकार आहे. त्यामुळे भारत तोडो सरकारला हे कळणार नाही. भारत जोडो यात्रेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे नाना पटोले म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी