शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

आगामी निवडणुका Congress स्वबळावरच लढवणार, BJP जमीनदोस्त होणार, Nana Patole यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:12 IST

Congress, Nana Patole News: एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

नांदेड : एकत्रित लढल्यामुळे नुकसान हाेते हे पंढरपूरच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका मातेच्या दर्शनासाठी ते सपत्नीक आले होते.यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल शंभरीच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहेे. मात्र, विद्वेषाची परंपरा असलेल्या भाजपला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही. या सर्वांवरून लक्ष वळविण्यासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. हे सर्व माध्यमावर सातत्याने दाखविले जात आहे. हा सर्व प्रकार आता जनतेला कळला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप या देशातूनच जमीनदोस्त होईल. 

भाजपला पर्याय काँग्रेसच : एकत्र लढल्याने नुकसानच झाले आहे हे पंढरपूरच्या निवडणुकीत दिसले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, दरवेळी काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे जाणीवपूर्वक विभाजन करण्यात आले. प्रत्येकाने हे विभाजन केले. त्यामुळे जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली. त्यामुळे भाजपला पर्याय हा काँग्रेसच असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा