शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: मंत्रिमंडळाचा विस्तार असंवैधानिक; शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडेल, नाना पटोलेंचं भाकित

By अभिनय खोपडे | Updated: August 9, 2022 18:51 IST

Nana Patole: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.

- अभिनय खोपडे वर्धा : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून आज झालेला मंत्रीमंडळाचा विस्तारही असंवैधानिक असल्याची टिका करीत हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली.नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयाकडे बोट दाखवत राज्यपालांनी एक वर्षापर्यंत विधानसभेचा अध्यक्ष होऊ दिला नाही. विचारणा केल्यावर असंवैधानिकतेचे कारण पुढे करण्यात आले. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच अध्यक्षाची निवड होत आज मंत्रीमंडळाचा विस्तारही झाला.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक असून त्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रमणा यांनीही दुजोराच दिला आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या इशाऱ्यावर काम करणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभले हे राज्यासाठी दुदैवच आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार असंवैधानिक आपण म्हणत आहात, मग मंत्रीमंडळाचा विस्तार हा असंवैधानिक का असा प्रश्न विचारला असता आज मंत्रीमंडळाचा झालेला विस्तारही असंवैधानिक असल्याचे नाना पटोले यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. मंत्रीमंळाचा विस्तार झाला खरा पण मंत्री मंडळात किती महिलांना मंत्री म्हणून संधी मिळाली हे बघणे आज गरजेचेच असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष चारूलता टोकस, माजी पालकमंत्री आ. सुनील केदार, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार अमर काळे, अतुल लोंढे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे, जिया पटेल, अमर वऱ्हाडे आदींची उपस्थिती होती.

 भाजपची उलटगिणती सुरूबिहार राज्यात नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला आहे. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या उलटगिणतीची सुरूवात आहे. जीवनावश्यक विविध वस्तू आणि शेतमालावर जीएसटी लावून आम्ही किती महसूल गोळा केला आणि करणार याचा गाजावाजा केला जात आहे. पण सरकार पैसे किंवा नफा कमविण्यासाठी नसतेच. शिवाय जनतेला आधार देण्यासाठी असते हे वास्तव आहे. जीएसटीच्या नावावर जनतेच्या खिशातून पैसा तर कर्जाच्या नावावर विदेशातून कर्ज काढले जात आहे. पण पैसा जातो कुठे असा प्रश्न याप्रसंगी नाना पटोले यांनी उपस्थित केला.बॉक्स

चित्रफितून मांडले ईडीच्या भीतीचे वास्तवभाजपच्या विरोधात बोलल्यास ईडीचा ससेमीरा लागेल किंवा लावला जाईल अशी भीती सध्या सर्वसामान्यांमध्ये आहे. भाजपच्या विरोधात बोलल्यास किंवा विरोध केल्यास अडचणीत भर पडेल याबाबत सध्या सर्वसामान्यही बोलके होत असल्याचे उदाहरण नाना पटोले यांनी एका वृत्तवाहिनीवर प्रसारित झालेल्या चित्रफित पत्रकार परिषदेदरम्यान दाखवून सर्वसामान्यांच्या मनातील ईडीच्या भीतीचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा