शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Nana Patole: "केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 11:29 IST

Nana Patole: "राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, पण महाराष्ट्र शासन त्यासाठी समर्थ आहे."

मुंबई: 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. कालच्या सभेत राज यांनी सरकारला 3 ता तारखेचा अल्टीमेटम दिला असून, त्यानंतर मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसने टोला लगावला आहे.

'राज आणि देवेंद्र सारखेच'नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले, त्याच पद्धतीचे राज ठाकरेंनी भाषण केले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही," असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

'भाजपकडून मनसेचा वापर'ते पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपने हे सर्व सुरू केले आहे. राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही.'' राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, त्यावर बोलताना पटोले म्हणतात, "चार तरखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. पण, त्यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल." 

'महाराष्ट्राचा तमाशा थांबवा'ते पुढे बोलताना म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा इशारा कुठेही कामात येणार नाही. त्यांनी सुरु केलेला धार्मिक वाद बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हा वाद योग्य नाही, काँग्रेस धार्मिक वादात पडू इच्छित नाही. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNana Patoleनाना पटोलेMNSमनसेcongressकाँग्रेसBJPभाजपा