शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole: "केंद्राचे अपयश लपवण्यासाठी भाजपकडून राज ठाकरेंचा वापर", काँग्रेसची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2022 11:29 IST

Nana Patole: "राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, पण महाराष्ट्र शासन त्यासाठी समर्थ आहे."

मुंबई: 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेमध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. कालच्या सभेत राज यांनी सरकारला 3 ता तारखेचा अल्टीमेटम दिला असून, त्यानंतर मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसने टोला लगावला आहे.

'राज आणि देवेंद्र सारखेच'नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "काल देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचे भाषण केले, त्याच पद्धतीचे राज ठाकरेंनी भाषण केले. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही," असा टोला नाना पटोले यांनी लगावला. 

'भाजपकडून मनसेचा वापर'ते पुढे म्हणाले की, "केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपने हे सर्व सुरू केले आहे. राज ठाकरेंसारख्या लोकांचा वापर करुन धार्मिक अस्थिरतेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या भूमिकेमुळे आता राज्यातील जनता भाजपाला माफ करणार नाही.'' राज ठाकरेंनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिलाय, त्यावर बोलताना पटोले म्हणतात, "चार तरखेपासून मोठ्या आवाजामध्ये मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. पण, त्यासाठी शासन सक्षम आहे. राज्य सरकार योग्य ती कारवाई नक्की करेल." 

'महाराष्ट्राचा तमाशा थांबवा'ते पुढे बोलताना म्हणाले की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे भोंग्यांबद्दल जवळपास सगळीकडे कारवाई झालेली आहे. त्यामुळे त्यांचा इशारा कुठेही कामात येणार नाही. त्यांनी सुरु केलेला धार्मिक वाद बरोबर नाही. राज्याच्या विकासासाठी हा वाद योग्य नाही, काँग्रेस धार्मिक वादात पडू इच्छित नाही. काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहणार आहे. काँग्रेसची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासाची राहणार आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNana Patoleनाना पटोलेMNSमनसेcongressकाँग्रेसBJPभाजपा