शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

नाना पटोलेंचे काँग्रेसकडून यथायोग्य पुनर्वसन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:10 IST

भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर पटोले यांनी अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या एक वर्षापूर्वी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले विदर्भातील नेते नाना पटोले यांचं पुनर्वसन काँग्रेसकडून करण्यात येत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभेला निकराची झुंज देणाऱ्या पटोले यांना काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद देऊ केले आहे. आगामी काळात भाजपने सरकार पाडण्यासाठी काही प्रयत्न केल्यास, विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा स्थितीत पटोले भाजपशी सहज दोन हात करू शकतील, असाही त्यामागे हेतू आहे. 

पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या धोरणांना विरोध करण्यासाठी कोणीही धजावत नसताना नाना पोटले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोदींना आव्हान दिले होते. त्यामुळे मोदींची त्यांच्यावर नाराजी होती. त्यानंतर पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

काँग्रेसकडून त्यांना लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी गडकरी यांच्याविरुद्ध चांगलीच फाईट दिली होती. त्या फळ त्यांना मिळत नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. 

भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांवर पटोले यांनी अनेकदा टीका केली आहे. आता विधानसभेत भाजप आणि पटोले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद असणार आहे.