शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:35 IST

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

"शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर म्हणू द्यात. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही. आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो", असं राजेश टोपे म्हणाले. 

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर बोलतात पण मला वाटत नाही की आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि इतरही प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं संभाजीनगर!राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजी बीकेसी येथील जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर असं नामांतराची गरजच काय? असं विधान केलं होतं.  त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत औरंगाबादचं नामांतर आता भाजपाची सत्ता आल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. यारुन त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायमचा झाला कचरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे