शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:35 IST

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

"शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर म्हणू द्यात. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही. आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो", असं राजेश टोपे म्हणाले. 

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर बोलतात पण मला वाटत नाही की आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि इतरही प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं संभाजीनगर!राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजी बीकेसी येथील जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर असं नामांतराची गरजच काय? असं विधान केलं होतं.  त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत औरंगाबादचं नामांतर आता भाजपाची सत्ता आल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. यारुन त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायमचा झाला कचरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे