शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 12:35 IST

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

"शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर म्हणू द्यात. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही. आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो", असं राजेश टोपे म्हणाले. 

गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर बोलतात पण मला वाटत नाही की आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि इतरही प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं संभाजीनगर!राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजी बीकेसी येथील जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर असं नामांतराची गरजच काय? असं विधान केलं होतं.  त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत औरंगाबादचं नामांतर आता भाजपाची सत्ता आल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. यारुन त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायमचा झाला कचरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेAurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे