शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election Results: नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत नाराजी; आमदारांनीच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:57 IST

या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या

मुंबई – राज्यातील नगपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्या खालोखाल भाजपानेही नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारली. राज्यातील महाविकास आघाडीनं भाजपाला धक्का दिला असला तरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातले लढले होते.

नगर पंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्रित लढण्याची इच्छा होती. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या.सत्तेतील काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसनं ३१६ जागा पटकावल्या तर मुख्यमंत्री असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेला २८४ जागा जिंकता आल्या.

नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी पसरली आहे. विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जयस्वाल यांनीही पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं विधान केले आहे. जयस्वाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेला योग्य ते स्थान मिळालं नाही. पक्षाने काळजी घेणं गरजेचे आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात शिवसेनेसाठी हे धोकादायक आहे. पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत कोकणातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. योगेश कदम म्हणाले की, ५ वर्ष ज्या शिवसेनेची सत्ता दापोली नगरपंचायतीवर होती ती सत्ता आता राष्ट्रवादीकडे गेली. जे शिवसेनेच्या AB फॉर्मवर निवडून आले ते शिवसैनिक नाही ते अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत येत त्यांना फॉर्म दिले गेले. ६ पैकी ४ राष्ट्रवादीचे आहेत. पूर्णपणे शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं हे काम काही नेत्यांनी केले. ही छुपी निती आमच्या काही नेत्यांची होती. दापोलीत तेच झालं. शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. त्यात फायदा कोणाचा झाला तर तो राष्ट्रवादीचा झाला. जे मतदान विधानसभेला शिवसेनेला झालं होतं त्यापेक्षा साडेतीनशे मतदान जास्त अपक्षांना झालं आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही या निवडणुकीतून लांब होतो. मंडणगड येथे शिवसेनेची ताकद असताना जागा वाटपात कमी जागा दिल्या गेल्या. मंडणगडमध्ये शिवसेनेने केवळ ४ जागा घेतल्या होत्या. त्याठिकाणी ८ अपक्ष जे शिवसैनिक उभे राहिले ते निवडून आले. तिथे एकहाती सत्ता शिवसेनेची आली असती अशी खंतही आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस