शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

Nagar Panchayat Election Results: नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत नाराजी; आमदारांनीच दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:57 IST

या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या

मुंबई – राज्यातील नगपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्या खालोखाल भाजपानेही नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारली. राज्यातील महाविकास आघाडीनं भाजपाला धक्का दिला असला तरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातले लढले होते.

नगर पंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्रित लढण्याची इच्छा होती. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या.सत्तेतील काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसनं ३१६ जागा पटकावल्या तर मुख्यमंत्री असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेला २८४ जागा जिंकता आल्या.

नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी पसरली आहे. विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जयस्वाल यांनीही पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं विधान केले आहे. जयस्वाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेला योग्य ते स्थान मिळालं नाही. पक्षाने काळजी घेणं गरजेचे आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात शिवसेनेसाठी हे धोकादायक आहे. पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत कोकणातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. योगेश कदम म्हणाले की, ५ वर्ष ज्या शिवसेनेची सत्ता दापोली नगरपंचायतीवर होती ती सत्ता आता राष्ट्रवादीकडे गेली. जे शिवसेनेच्या AB फॉर्मवर निवडून आले ते शिवसैनिक नाही ते अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत येत त्यांना फॉर्म दिले गेले. ६ पैकी ४ राष्ट्रवादीचे आहेत. पूर्णपणे शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं हे काम काही नेत्यांनी केले. ही छुपी निती आमच्या काही नेत्यांची होती. दापोलीत तेच झालं. शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. त्यात फायदा कोणाचा झाला तर तो राष्ट्रवादीचा झाला. जे मतदान विधानसभेला शिवसेनेला झालं होतं त्यापेक्षा साडेतीनशे मतदान जास्त अपक्षांना झालं आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही या निवडणुकीतून लांब होतो. मंडणगड येथे शिवसेनेची ताकद असताना जागा वाटपात कमी जागा दिल्या गेल्या. मंडणगडमध्ये शिवसेनेने केवळ ४ जागा घेतल्या होत्या. त्याठिकाणी ८ अपक्ष जे शिवसैनिक उभे राहिले ते निवडून आले. तिथे एकहाती सत्ता शिवसेनेची आली असती अशी खंतही आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवली.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस