शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

मविआकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेच्या गैरवापरानंतरही भाजपा नंबर एकचा पक्ष, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 18:08 IST

Maharashtra Nagar Panchayat Election Results 2022: राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी एकत्रित बेरीज केल्या मोठी मुसंडी मारली आहे. तसेच आतापर्यंतच्या निकालांमध्ये सर्वाधिक २५ नगरपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सर्वाधिक ४१६ नगरसेवक भाजपाचे जिंकून आले आहेत.

मुंबई - राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल  आज जाहीर झाले. यामध्ये राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी एकत्रित बेरीज केल्या मोठी मुसंडी मारली आहे. (Nagar Panchayat Election Result 2022) तसेच आतापर्यंतच्या निकालांमध्ये सर्वाधिक २५ नगरपंचायती जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सर्वाधिक ४१६ नगरसेवक भाजपाचे जिंकून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, राज्यात मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेचा गैरवापर होऊनही भाजपाच एक नंबरचा पक्ष होता आणि राहील असा दावा केला आहे. (Maharashtra Local Body Election Results 2022)

देवेंद्र फडणवीस या निकालांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती आणि सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील. भाजपाच्या २४  आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.

जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींमध्ये भाजपाने मिळवलेल्या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे परिश्रमी कार्यकर्ते आहेत. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणाऱ्या सर्व मतदारांचेही मी मन:पूर्वक आभार मानतो. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अघोरेखित झाले आहे. मा. मोदींचे नेतृत्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेही हे यश आहे., असे फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान आज लागलेल्या नगरपंचायतींच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील पक्षांचेच वर्चस्व दिसून आले आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीला सर्वाधिक २५ नगरपंचायती आणि ३७८ जागा तर भाजपला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेसला १८ नगरपंचायती आणि २९७ जागा तर शिवसेनेला १२ नगरपंचायती, ३०१ जागा मिळाल्या आहेत. 

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा