शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
5
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
6
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
7
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
8
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
9
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
10
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
11
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
12
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
13
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
14
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
15
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
16
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
17
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
18
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
19
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
20
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:45 IST

अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील युती आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभांमध्ये भाजप-शिवसेना युती निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे युतीची शक्यता वाढली आहे. तर, आघाडीची बोलणी अद्याप अधांतरीच आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात अजुनही एकमत झाले नाही. तर जागा वाटपात दुय्यम स्थान मिळल्याने एमआयएमने 'एकला चलो रे'चा नारा देत वंचितला जय महाराष्ट्र केले आहे. याचा लाभ एमआयएमला फारसा होणार नसला तरी वंचितला तोटाच होणार हे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम आणि दलित मतांचं समीकरण जुळवून दखल घेण्याजोगी मतं मिळवली होती. त्यामुळे हे समीकरण विधानसभेला आणखी प्रभावी ठरणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, एमआयएम बाहेर पडल्याने आंबेडकर एकट्यानेच निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता वंचितमधून बाहेर पडून एमआयएमच्या ताकदीला बऱ्याच मर्यादा येणार आहे. तर मुस्लीम मतांना सोडून निवडणूक लढविण्याचा निर्धार करणाऱ्या वंचितला नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच एमआयएमचं राज्यातील संघटन पाहता, ही मते पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, याला प्रकाश आंबेडकरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट वंचितने सुरुवातीला काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली. त्यानंतर वंचितने काँग्रेसला १४४ जागांची ऑफर देत काही एक अट घातली. यामध्ये राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट आंबेडकरांनी ठेवली आहे. त्यावर काँग्रेस तयार नाही. त्यातच काँग्रेस हायकमांडकडून देखील 'वंचित'शिवाय तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस-वंचित एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान काँग्रेस-वंचित आघाडीच्या आशा धुसर दिसू लागल्यानंतर एमआयएमने प्रकाश आंबेडकरांकडे १०० जागांची मागणी केली होती. त्यावर अनेक दिवस आंबेडकरांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस एमआयएमसोबत बोलणी झाल्याचे सांगत आमचं ठरल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. परंतु, जागांचा फॉर्म्युला सांगितला नव्हता. अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.