शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:45 IST

अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील युती आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभांमध्ये भाजप-शिवसेना युती निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे युतीची शक्यता वाढली आहे. तर, आघाडीची बोलणी अद्याप अधांतरीच आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात अजुनही एकमत झाले नाही. तर जागा वाटपात दुय्यम स्थान मिळल्याने एमआयएमने 'एकला चलो रे'चा नारा देत वंचितला जय महाराष्ट्र केले आहे. याचा लाभ एमआयएमला फारसा होणार नसला तरी वंचितला तोटाच होणार हे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम आणि दलित मतांचं समीकरण जुळवून दखल घेण्याजोगी मतं मिळवली होती. त्यामुळे हे समीकरण विधानसभेला आणखी प्रभावी ठरणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, एमआयएम बाहेर पडल्याने आंबेडकर एकट्यानेच निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता वंचितमधून बाहेर पडून एमआयएमच्या ताकदीला बऱ्याच मर्यादा येणार आहे. तर मुस्लीम मतांना सोडून निवडणूक लढविण्याचा निर्धार करणाऱ्या वंचितला नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच एमआयएमचं राज्यातील संघटन पाहता, ही मते पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, याला प्रकाश आंबेडकरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट वंचितने सुरुवातीला काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली. त्यानंतर वंचितने काँग्रेसला १४४ जागांची ऑफर देत काही एक अट घातली. यामध्ये राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट आंबेडकरांनी ठेवली आहे. त्यावर काँग्रेस तयार नाही. त्यातच काँग्रेस हायकमांडकडून देखील 'वंचित'शिवाय तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस-वंचित एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान काँग्रेस-वंचित आघाडीच्या आशा धुसर दिसू लागल्यानंतर एमआयएमने प्रकाश आंबेडकरांकडे १०० जागांची मागणी केली होती. त्यावर अनेक दिवस आंबेडकरांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस एमआयएमसोबत बोलणी झाल्याचे सांगत आमचं ठरल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. परंतु, जागांचा फॉर्म्युला सांगितला नव्हता. अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.