शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:47 IST

ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली. 

मुंबई - ४ वर्षापूर्वी ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर लावण्यात आला होता. आता या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गौप्यस्फोट करून गुन्हेगाराला वाचवणारा आका या सरकारमधील मंत्रिमंडळात आहे असा गौप्यस्फोट केला आहे. आव्हाडांनी आज मुंबईतील मोर्चावेळी ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंत्रिमंडळ अनेक आका आहेत. हत्येतील आरोपी सुटतो कसा? त्याला पोलीस पकडायला जातात त्या अधिकाऱ्यांची बदली कशी होते? त्या बदलीचा स्टेटस गुन्हेगाराने त्याच्या व्हॉट्सअपवर ठेवला होता. जमील शेख हत्या प्रकरणात एफआयआरमध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव घेतले नाही. तो खूनात नाही हे पोलिसांना सांगावे लागेल. एफआयआर असा रद्द करता येत नाही. त्यात नाव असताना तुम्ही चार्जशीटमध्ये साधा उल्लेखही करत नाही तो दोषी आहे की निर्दोष याचा अर्थ कसा घ्यायचा असा सवाल त्यांनी केला.

तसेच २०१४ साली असाच गुन्हा केला होता. ज्याला मारलं त्याने कोर्टात जबाब दिला होता. एफआयआरमध्ये नजीब मुल्ला यांचे नाव घेतले आहे. आमच्यासोबत तो होतो. FIR मध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव का घेत नाहीत. त्याच्याविरोधात पुरावा नाही हे चार्जशीटमध्ये लिहा. ज्याने सुपारी घेतली त्या गुन्हेगाराने ३ पेनड्राईव्ह पाठवले, त्याचे ४ झाले. कुठल्या आकाने फोन केला, पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ, गोरखपूरपर्यंत केली होती. पहिला आरोपी पकडला त्याने नाव सांगितले, कुणाच्या सांगण्यावरून गोळी झाडली मात्र त्याच नितीन ठाकरेची बदली ८ तासांत केली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. 

दरम्यान, हिंमत असेल तर त्याच्या हातात तपास द्या. नितीन ठाकरेची बदली झाल्यावर नजीब मुल्लाने स्टेटस ठेवले होते. एवढी हिंमत कुठून होते, ही मानसिकता, विकृती आहे. जमील शेखला त्यानेच २०१४ ला मारले होते. सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर मी हा विषय काढतो. त्या कुटुंबाने अनेकदा माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी भेट नाकारली. कारण आपण राजकारण करतोय असा आरोप व्हायला नको. मी राजकारण करत नाही. मी त्या कुटुंबाच्या बाजूने बोलतोय. मला राजकारण करायचं असते तर निवडणुकीत वापर केला असता. FIR मध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये तो आरोपी आहे की नाही हे सांगावेच लागते असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMNSमनसेPoliceपोलिस