शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:47 IST

ठाण्यात मनसे पदाधिकारी जमील शेखची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपींना वाचवण्यासाठी ८ तासात पोलीस अधिकाऱ्याची बदली केली. 

मुंबई - ४ वर्षापूर्वी ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर लावण्यात आला होता. आता या प्रकरणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी गौप्यस्फोट करून गुन्हेगाराला वाचवणारा आका या सरकारमधील मंत्रिमंडळात आहे असा गौप्यस्फोट केला आहे. आव्हाडांनी आज मुंबईतील मोर्चावेळी ठाण्यातील जमील शेख हत्या प्रकरणाला पुन्हा वाचा फोडली.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मंत्रिमंडळ अनेक आका आहेत. हत्येतील आरोपी सुटतो कसा? त्याला पोलीस पकडायला जातात त्या अधिकाऱ्यांची बदली कशी होते? त्या बदलीचा स्टेटस गुन्हेगाराने त्याच्या व्हॉट्सअपवर ठेवला होता. जमील शेख हत्या प्रकरणात एफआयआरमध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव घेतले नाही. तो खूनात नाही हे पोलिसांना सांगावे लागेल. एफआयआर असा रद्द करता येत नाही. त्यात नाव असताना तुम्ही चार्जशीटमध्ये साधा उल्लेखही करत नाही तो दोषी आहे की निर्दोष याचा अर्थ कसा घ्यायचा असा सवाल त्यांनी केला.

तसेच २०१४ साली असाच गुन्हा केला होता. ज्याला मारलं त्याने कोर्टात जबाब दिला होता. एफआयआरमध्ये नजीब मुल्ला यांचे नाव घेतले आहे. आमच्यासोबत तो होतो. FIR मध्ये नाव असताना चार्जशीटमध्ये नाव का घेत नाहीत. त्याच्याविरोधात पुरावा नाही हे चार्जशीटमध्ये लिहा. ज्याने सुपारी घेतली त्या गुन्हेगाराने ३ पेनड्राईव्ह पाठवले, त्याचे ४ झाले. कुठल्या आकाने फोन केला, पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ, गोरखपूरपर्यंत केली होती. पहिला आरोपी पकडला त्याने नाव सांगितले, कुणाच्या सांगण्यावरून गोळी झाडली मात्र त्याच नितीन ठाकरेची बदली ८ तासांत केली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. 

दरम्यान, हिंमत असेल तर त्याच्या हातात तपास द्या. नितीन ठाकरेची बदली झाल्यावर नजीब मुल्लाने स्टेटस ठेवले होते. एवढी हिंमत कुठून होते, ही मानसिकता, विकृती आहे. जमील शेखला त्यानेच २०१४ ला मारले होते. सगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर मी हा विषय काढतो. त्या कुटुंबाने अनेकदा माझी भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी भेट नाकारली. कारण आपण राजकारण करतोय असा आरोप व्हायला नको. मी राजकारण करत नाही. मी त्या कुटुंबाच्या बाजूने बोलतोय. मला राजकारण करायचं असते तर निवडणुकीत वापर केला असता. FIR मध्ये नाव असेल तर पोलिसांना चार्जशीटमध्ये तो आरोपी आहे की नाही हे सांगावेच लागते असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMNSमनसेPoliceपोलिस