शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:20 IST

Womans Body Found In Pink Suitcase: मुंबईतील कर्जत-लोणावळा रेल्वे रुळावर ६ एप्रिल २०२५ रोजी एका गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

मुंबईतील कर्जत-लोणावळा रेल्वे रुळावर गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील एका पुरूष आणि एका महिलेला बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक केली. मृत महिला आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडण झाले. भांडण इतके वाढले की, आरोपींनी तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सांगितले की, '१६ एप्रिल २०२५ रोजी पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाजवळ गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. ठाकूरवाडी स्थानकाजवळ आरोपींनी चालत्या ट्रेनमधून सुटकेस फेकली असावी, असा पोलिसांना संशय होता. मृत महिला कोण होती, ती कुठून आली आणि तिला कोणी मारले? पोलिसांकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यानंतर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आलेले सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.'

तपासणी दरम्यान, १५ एप्रिल २०२५ रोजी एलटीटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एक तरुण आणि एक तरुणी गुलाबी सुटकेसह दिसले. त्यानंतर दोघेही रात्री १०.१७ मिनिटांनी मुंबई कोइम्बतूर एक्सप्रेसच्या (क्रमांक १०१४९६) ए-१ एसी डब्यात चढले. पोलिसांनी या डब्यातून प्रवास करणाऱ्या सर्व ५२ प्रवाशांची माहिती आणि आरक्षणासाठी दिलेले मोबाईल क्रमांक गोळा केली. दोन्ही आरोपी बंगळुरूत उतरल्याचा पोलिसांना समजले. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्याकडे कोणतीही  सुटकेस दिसली नाही. यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलीस आरोपींच्या घरी गेले असता, ते तिथे नव्हते. यानंतर नंतर पोलिसांनी दोघांचा नंबर ट्रॅक करून त्यांचा शोध घेतला. दोघांनाही बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबूली दिली. व्ही विजयकुमार व्यंकटेश (वय, २६) आणि यशस्विनी राजा तातीकोलू (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  व्यंकटेश बी.टेकचा विद्यार्थी आहे. तर, यशस्विनी पदव्युत्तर आहे. धनलक्ष्मी रेड्डी (वय, ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. धनलक्ष्मी रेड्डीशी भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी मिळून धनलक्ष्मीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळावर फेकून दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी