शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:20 IST

Womans Body Found In Pink Suitcase: मुंबईतील कर्जत-लोणावळा रेल्वे रुळावर ६ एप्रिल २०२५ रोजी एका गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

मुंबईतील कर्जत-लोणावळा रेल्वे रुळावर गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील एका पुरूष आणि एका महिलेला बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक केली. मृत महिला आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडण झाले. भांडण इतके वाढले की, आरोपींनी तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सांगितले की, '१६ एप्रिल २०२५ रोजी पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाजवळ गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. ठाकूरवाडी स्थानकाजवळ आरोपींनी चालत्या ट्रेनमधून सुटकेस फेकली असावी, असा पोलिसांना संशय होता. मृत महिला कोण होती, ती कुठून आली आणि तिला कोणी मारले? पोलिसांकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यानंतर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आलेले सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.'

तपासणी दरम्यान, १५ एप्रिल २०२५ रोजी एलटीटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एक तरुण आणि एक तरुणी गुलाबी सुटकेसह दिसले. त्यानंतर दोघेही रात्री १०.१७ मिनिटांनी मुंबई कोइम्बतूर एक्सप्रेसच्या (क्रमांक १०१४९६) ए-१ एसी डब्यात चढले. पोलिसांनी या डब्यातून प्रवास करणाऱ्या सर्व ५२ प्रवाशांची माहिती आणि आरक्षणासाठी दिलेले मोबाईल क्रमांक गोळा केली. दोन्ही आरोपी बंगळुरूत उतरल्याचा पोलिसांना समजले. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्याकडे कोणतीही  सुटकेस दिसली नाही. यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलीस आरोपींच्या घरी गेले असता, ते तिथे नव्हते. यानंतर नंतर पोलिसांनी दोघांचा नंबर ट्रॅक करून त्यांचा शोध घेतला. दोघांनाही बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.

पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबूली दिली. व्ही विजयकुमार व्यंकटेश (वय, २६) आणि यशस्विनी राजा तातीकोलू (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.  व्यंकटेश बी.टेकचा विद्यार्थी आहे. तर, यशस्विनी पदव्युत्तर आहे. धनलक्ष्मी रेड्डी (वय, ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. धनलक्ष्मी रेड्डीशी भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी मिळून धनलक्ष्मीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळावर फेकून दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी