शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आता मुंबई विद्यापीठात परीक्षा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 2:54 AM

मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही.

ठळक मुद्दे‘बीबीआय’चा पेपरविद्यार्थिनीचे नाव यादीतून गायब 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही. ‘डिफॉल्टर’ असल्यामुळे नाव आले नसेल, असे या वेळी तिला सांगण्यात आल्याने, आता काय करायचे? हा प्रश्न विद्यार्थिनीला सतावत आहे. बीबीआय अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. शुक्रवार, १0 नोव्हेंबरला ‘मार्केटिंग इन बॅकिंग अँड इन्शुरन्स’चा पेपर होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. हॉल तिकीट क्रमांकाप्रमाणे तिने वर्ग शोधला व वर्गात गेली, पण वर्गात गेल्यावर तिला धक्का बसला. तिच्या पुढचा व मागचा क्रमांक बेंचवर होता, पण हिचाच क्रमांक लिहिला नसल्यामुळे आता काय करायचे, असे तिने त्या केंद्रावरील प्राध्यापकांना विचारले. एखादे वेळेस नंबर लिहायचा राहिला असेल, तू त्या वर्गातल्या रिकाम्या बेंचवर बस आणि पेपर दे, असे तिला सांगण्यात आले. विद्यार्थिनी दहा वाजता त्या वर्गात जाऊन बसली, पण त्या वर्गातल्या पर्यवेक्षकाने यादीत नाव नसल्याचे सांगून परीक्षेस बसण्यास मनाई केली. मीनल (नाव बदलेले आहे) बीबीआयचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी माझा पहिला पेपर होता. आधीच थोडा ताण होता. मला हॉल तिकीट मिळाले असल्यामुळे, मी निश्‍चितपणे परीक्षा केंद्रावर गेले होते, पण तिथे हा वेगळाच गोंधळ समोर आला. मी डिफॉल्टर असेन, तर मला विद्यापीठाने हॉल तिकीट कसे पाठविले? असा प्रश्न मीनलने उपस्थित केला आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकलेला नाही.

जबाबदार कोण?पाचव्या सत्राचा पहिला पेपर मला देता आलेला नाही. आता हे वर्ष वाया गेले, तर जबाबदार कोण? सोमवारी माझा पेपर आहे. मला कदाचित पेपर द्यायला मिळेल, पण जर त्या दिवशीही नाव यादीत नसल्यास, पेपर पाठवूनदेखील तपासणी करून मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, असे विद्यार्थीनीचे म्हणने आहे.

टॅग्स :universityविद्यापीठeducationशैक्षणिक