शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

आता मुंबई विद्यापीठात परीक्षा गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 07:47 IST

मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही.

ठळक मुद्दे‘बीबीआय’चा पेपरविद्यार्थिनीचे नाव यादीतून गायब 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठात निकालाच्या  गोंधळानंतर आता परीक्षेमधील गोंधळांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनीला हॉल तिकीट मिळाले, परीक्षा देण्यासाठी शुक्रवारी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली, पण विद्यापीठाकडून त्या विद्यार्थिनीचा क्रमांक परीक्षा केंद्रावर पोहोचला नसल्याने, त्या विद्यार्थिनीला परीक्षेला बसायलाच मिळाले नाही. ‘डिफॉल्टर’ असल्यामुळे नाव आले नसेल, असे या वेळी तिला सांगण्यात आल्याने, आता काय करायचे? हा प्रश्न विद्यार्थिनीला सतावत आहे. बीबीआय अभ्यासक्रमाची पाचव्या सत्राची परीक्षा सुरू आहे. शुक्रवार, १0 नोव्हेंबरला ‘मार्केटिंग इन बॅकिंग अँड इन्शुरन्स’चा पेपर होता. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थिनी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. हॉल तिकीट क्रमांकाप्रमाणे तिने वर्ग शोधला व वर्गात गेली, पण वर्गात गेल्यावर तिला धक्का बसला. तिच्या पुढचा व मागचा क्रमांक बेंचवर होता, पण हिचाच क्रमांक लिहिला नसल्यामुळे आता काय करायचे, असे तिने त्या केंद्रावरील प्राध्यापकांना विचारले. एखादे वेळेस नंबर लिहायचा राहिला असेल, तू त्या वर्गातल्या रिकाम्या बेंचवर बस आणि पेपर दे, असे तिला सांगण्यात आले. विद्यार्थिनी दहा वाजता त्या वर्गात जाऊन बसली, पण त्या वर्गातल्या पर्यवेक्षकाने यादीत नाव नसल्याचे सांगून परीक्षेस बसण्यास मनाई केली. मीनल (नाव बदलेले आहे) बीबीआयचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी माझा पहिला पेपर होता. आधीच थोडा ताण होता. मला हॉल तिकीट मिळाले असल्यामुळे, मी निश्‍चितपणे परीक्षा केंद्रावर गेले होते, पण तिथे हा वेगळाच गोंधळ समोर आला. मी डिफॉल्टर असेन, तर मला विद्यापीठाने हॉल तिकीट कसे पाठविले? असा प्रश्न मीनलने उपस्थित केला आहे. या प्रकरणासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकलेला नाही.

जबाबदार कोण?पाचव्या सत्राचा पहिला पेपर मला देता आलेला नाही. आता हे वर्ष वाया गेले, तर जबाबदार कोण? सोमवारी माझा पेपर आहे. मला कदाचित पेपर द्यायला मिळेल, पण जर त्या दिवशीही नाव यादीत नसल्यास, पेपर पाठवूनदेखील तपासणी करून मिळेल की नाही, याची शाश्‍वती नाही, असे विद्यार्थीनीचे म्हणने आहे.

टॅग्स :universityविद्यापीठeducationशैक्षणिक