शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

मुंबई ते अहमदाबाद केवळ दोन तासांत...; बुलेट ट्रेनच्या पाच किमी लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 07:03 IST

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या काळात रखडलेले काम आता लवकर पूर्ण करण्याचे ध्येय आहे.

मुंबई - बुलेट ट्रेनमुळे मुंबईहून अहमदाबाद हे अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणार आहे.  प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर ३० मिनिटांनी ट्रेन पकडता येणार आहे.

त्यामुळे अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवर ताटकळत उभे राहावे लागणार नाही. तसेच, या ट्रेनचे तिकीट स्टेशनवरच उपलब्ध होईल, अशी माहिती रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी दिली. घणसोली ते शिळफाटादरम्यान ५ किमी लांबीच्या बोगद्याचे काम रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

असे सुरू आहे बोगद्याचे काम

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसी आणि शिळफाटादरम्यानच्या २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येत आहे. या  बोगद्यापैकी ५ किमी लांबीचा बोगदा शिळफाटा आणि घणसोलीदरम्यान न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड (एनएटीएम) वापरून बांधला जात आहे, तर उर्वरित १६ किमी लांबीचा बोगदा टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून बांधला जात आहे. या बोगद्यात ठाणे खाडीखालील ७ किमी लांबीच्या भागाचाही समावेश आहे.

नदीपूलदेखील पूर्णत्वाकडेघणसोली ते शिळफाटा या ५ किमीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले. प्रकल्पासाठी हा मैलाचा दगड असल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. सध्या ३२० किमी वायडक्ट पूर्ण झाला असून, नदीपूलदेखील पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. साबरमती टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या काळात रखडलेले काम आता लवकर पूर्ण करण्याचे ध्येय आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ वाचणार असून, ठाणे, सुरत, वापी वडोदरा अशा शहरांची आर्थिक प्रगती साध्य होणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे