शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आता ‘आयटीएमएस’ प्रणाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:55 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या.

मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्याआधी मृत्यूचा सापळा झालेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘आयटीएमएस’ राबवण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या.रस्ता सुरक्षा परिषदेची सातवी बैठक सोमवारी झाली. बैठकीस परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्यासह अन्य अधिकारी होते.नागपूर-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आयटीएमएस सुविधा कार्यान्वित होण्याआधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ही प्रणाली राबवा, अशा सूचना त्यांनी केल्या. तर, निविदा प्रक्रिया सुरू केल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले. रावते यांनी नागपूर-मुंबई महामार्गावरून खडेबोल सुनावले. ‘वेळ मोजू नका, सुरक्षेला प्राधान्य द्या’ असे ते म्हणाले.महामार्गावर २५ टोलनाकेनागपूर-मुंबई महामार्गावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी एकूण २५ टोल उभारण्यात येतील. तसेच हे टोलनाके स्वयंचलित असतील. दरम्यान, मुख्य महामार्गावर एकही टोल नसेल, अशी माहिती बैठकीत महामंडळाने दिली.‘आयटीएमएस’ म्हणजे काय?महामार्गांवर अपघात टाळण्यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टिम’ राबवतात. हवामान, वाहतूक नियमांची माहिती देणारे डिजिटल फलक, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाईसाठी ई-चलान, मोफत वाय-फाय, या आणि अन्य सुविधांचा समावेश आयटीएमएसमध्ये असतो.सहा महिन्यांत अहवाल द्याराज्यातील घाटांमधील अपघात रोखण्यासंदर्भात तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय रस्ता सुरक्षा परिषदेत घेण्यात आला. आंबेनळी घाट दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रस्ता संरक्षा तज्ज्ञ, अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने सहा महिन्यांत शासनाकडे अहवाल सादर करावा.- दिवाकर रावते,परिवहन मंत्री

टॅग्स :highwayमहामार्गMumbaiमुंबईPuneपुणेnewsबातम्या