मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहेत. दरम्यान, ३० जून २०२५ आधी आमच्या मागण्या मान्य झाल्यास १ जुलैपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला . महत्त्वाचे म्हणजे, या संपामध्ये शालेय बस चालकही सहभागी होणार असल्याने पालकांना स्वत: त्यांच्या मुलांना शाळेत सोडवायला आणि शाळेतून घरी आणायला जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बस चालकांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपामुळे सर्व प्रकारच्या बसेस, ज्यामध्ये स्कूल बससह, उबर सारख्या अॅग्रीगेटर बसेस आणि खाजगी वाहतुकदारांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सरकारने ३० जून २०२५ नंतर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील विविध प्रवासी वाहतूक संघटनांनी अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई बस मालक संघटनेचे मुराद नाईक म्हणाले.
बस चालकांच्या मागण्या काय?ई-चलन दंड वसूल करणे थांबवणे, विद्यमान दंड माफ करणे, जड वाहनांसाठी अनिवार्य स्वच्छता नियम रद्द करणे आणि महानगरांमध्ये प्रवेश बंदीच्या वेळेचा पुनर्विचार करणे,अशा बस चालकांच्या मागण्या आहे.
पालकांमध्ये चिंतामुंबई शहरात मोठ्या प्रमाणात शालेय बस धावतात. अनेक शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची व्यवस्था करतात. तसेच काही खासगी वाहतूक कंपन्या देखील ही सेवा पुरवतात. अशा परिस्थिती बस चालकांनी संप पुकारल्यास पालकांनाच आपल्या मुलांना शाळेत सोडवायला तसेच शाळेतून घरी आणायला जावे लागणार आहे.