शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, दिवसभरात कोरोनाचे २ हजार ४०३ रुग्ण तर ६८ मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 07:40 IST

मुंबईतील आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबई : मुंबईत १० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून कमी होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाली. मुंबईत रविवारी २ हजार ४०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. काल, शनिवारी ही संख्या २६ हजारांहून अधिक होती. रुग्णसंख्येसोबतच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

मुंबईतील आजही कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बाधितांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ३७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत ६ लाख १३ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९१ टक्के झाला आहे. मुंबईत दिवसभरात ३२ हजार ५९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील २ हजार ४०३ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.मुंबईत २ मे ते ८ मे पर्यंत विचार केला असता मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.४४ टक्के इतका आहे. मुंबईत ६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या ६ लाख ७६ हजार ४७५ बाधित रुग्णांपैकी १३ हजार ८९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसभरात ६० हजार २२६ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात रविवारी दैनंदिन रुग्णांची संख्या ४८ हजार ४०१ इतकी होती. ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील २४ तासांत ६० हजार २२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ४४ लाख ७ हजार ८१८ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. सध्या ६ लाख १५ हजार ७८३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.४ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९४ लाख ३८ हजार ७९७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६ लाख ९६ हजार ८९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५१ लाख १ हजार ७३७ झाली असून, बळींचा आकडा ७५ हजार ८४९ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५७२ मृत्यूंपैकी ३१० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

आतापर्यंत १ कोटी ७९ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसराज्यात रविवारी दिवसभरात २ लाख ३६ हजार ९६० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर १८ ते ४४ वयोगटातील एकूण ३ लाख ८४ हजार ९९३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात एकूण आतापर्यंत १ कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ११ लाख २५ हजार ९६० आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ६७ हजार ६३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १५ लाख ५८५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ६ लाख १५ हजार ९९१ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये आतापर्यंत १ कोटी २० लाख २२ हजार ३५० लाभार्थ्यांना पहिला डोस तर २० लाख ४० हजार ४४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.