शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

मुंबई-गोवा प्रवास अर्ध्या तासाने घटणार!; कोकणवासीयांचा प्रवास लवकरच होणार ‘सुसाट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:25 IST

मुंबई-गोवा रेल्वे प्रवास अर्ध्या तासाने घटणार आहे. भारतीय रेल्वेचा अत्याधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ‘तेजस’ एक्स्प्रेसची ताशी ११० किमी वेगाने चाचणी शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली.

मुंबई : मुंबई-गोवा रेल्वे प्रवास अर्ध्या तासाने घटणार आहे. भारतीय रेल्वेचा अत्याधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ‘तेजस’ एक्स्प्रेसची ताशी ११० किमी वेगाने चाचणी शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली. या वेळी नेहमीच्या वेळेपेक्षा ही गाडी अर्धातास आधी मडगाव स्थानकात पोहोचली. आता रेल्वे सुरक्षा आयोगाच्या (सीआरएस) मंजुरीनंतर, प्रत्यक्षात तेजस एक्स्प्रेसमधून प्रवाशांना वेगवान प्रवास करणे शक्य होईल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शुक्रवारी सकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी तेजस एक्स्प्रेस चाचणीसाठी रवाना झाली. ती ७ वाजून २७ मिनिटांनी रोहा स्थानकात पोहोचली. वेळापत्रकाच्या वेळेनुसार तिने १३ मिनिटे आधी स्थानक गाठले. वेळापत्रकानुसार रोहा स्थानकावरील एक्स्प्रेसची वेळ ७ वाजून ४० मिनिटे आहे, तर मडगाव स्थानकात सुमारे ३० मिनिटे आधी, अर्थात दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी तेजस पोहोचली. वेळापत्रकानुसार मडगाव स्थानकाची वेळ २ वाजून ०५ मिनिटे आहे.तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी घेतलेल्या चाचणीचे सीएसएमटी ते रोहा आणि रोहा ते मडगाव अशा दोन भागांत विभाजन करण्यात आले होते. या मार्गावर चाचणी अनुक्रमे ११० किमी आणि १२० किमी प्रतितास या वेगाने पार पडली. सद्यस्थितीत ९० किमी आणि ११० किमी प्रतितास या वेगाने एक्स्प्रेस मुंबई ते गोवा हा टप्पा पार करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.संपूर्ण टप्पा टॉप स्पीडने पार करणे अशक्यदरम्यान, सीएसएमटी-मडगाव स्थानकादरम्यान संपूर्ण टप्पा टॉप स्पीडने पार करणे अशक्य आहे. मात्र, शक्य त्या विभागांमध्ये ‘तेजसने’ नियोजित वेगमर्यादेनुसार प्रवाशांविना १५ बोगींसह चाचणी पार पूर्ण केल्याचे रेल्वे अधिकाºयांने सांगितले.माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मे २०१७ मध्ये मुंबई-करमळी मार्गावर तेजस एक्स्प्रेसचे अनावरण केली होती. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र स्क्रीन, स्वयंचलित दरवाजे, प्रशस्त मोकळी जागा ही वैशिष्ट्ये असलेली तेजस एक्स्प्रेस अल्पावधीत प्रवाशांच्या चर्चेत आली होती.प्रवाशांना सुखद आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता यावा, यासाठी तेजस एक्स्प्रेसच्या चाचणीचे नियोजन होते. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. चाचणीचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाकडे पाठविण्यात येईल. आयोगाच्या मंजुरीनंतर तेजस एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात येईल.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र