शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

"यह तो झांकी है... मुंबई महापालिका अभी बाकी है...!", मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ट्विट! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 09:45 IST

BJP Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासह, आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. यातच आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्विट करत आपल्या पुढील टार्गेटचे संकेत दिले आहे.  

मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असतानाच सर्वच पक्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील सत्तेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुंबई भाजपने ट्विट करत म्हटले की, "यह तो झांकी है.... मुंबई महापालिका अभी बाकी है...!". या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाची सत्ता स्थापन होऊ शकते. आज किंवा उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या नवीन सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तसेच, भाजप आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संभाव्य मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. 

यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने ९१ जागा जिंकल्या होत्या तर भाजपाला ८३ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. परंतु काही वर्षापूर्वी मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांचे संख्याबळ ९७ वर पोहचले. यंदाच्या निवडणुकीत ९ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वार्ड पुर्नरचनेत कुणाला फायदा होईल हे निवडणुकीच्या निकालात कळेल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबईBJPभाजपाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाPoliticsराजकारण