शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
3
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
4
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
5
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
6
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
7
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
8
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
9
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
10
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
11
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
12
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
13
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
15
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
16
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
17
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
18
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
19
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
20
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं

MPSC News : 'एमपीएससी'कडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा; परिक्षार्थींची संख्या पोहचली २६ लाखांच्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 11:11 IST

राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केली जात आहे.

ठळक मुद्देशासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित

राहुल शिंदे - 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांहून २६ लाखांपर्यंत वाढली आहे. मात्र , राज्य शासनाकडून आयोगाच्या कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करण्याऐवजी घट केले जात आहे. त्यामुळे आयोगाला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी एमपीएससी करून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांना प्रविष्ट होतात. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. २०१०-११ यावर्षी आयोगाकडे परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख ६५ हजार 839 एवढी होती तर ही संख्या २०१८ १९ मध्ये २६ लाख ६४ हजार ४१ एवढी झाली. आयोगाकडे दिवसेंदिवस परीक्षांचा ताण वाढत आहे.अशा परिस्थितीत राज्य शासनाने आयोगाची सहाय्यक कक्ष अधिकारी संवर्गाची ८ व लिपिक टंकलेखक कर्मचारी वर्गाची १६ पदे कमी करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने शासनाला मनुष्यबळ बाबत निर्माण झालेल्या अडचणी तसेच वस्तुस्थिती सांगितली. मात्र त्यानंतर आहे.शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही.        महापरीक्षा पोर्टल सह राजपत्रित गट ब व गट क दर्जाच्या पदांची भरती आयोगामार्फत करता येऊ शकते, याबाबतचा पत्रव्यवहार आयोगातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आला होता. मात्र, तरीही शासन याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही. त्यामुळे शासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग गुंडाळून ठेवायचा आहे का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.-------------------------------------------वर्ष                    परीक्षेस अर्ज करणारे विद्यार्थी२०१०-११              ५,५६,८३९२०११-१२              ५,६७,५०१२०१२-१३              ८,३४,५७२२०१३-१४             ११,०५,३०५२०१४-१५             ४,५२,४०७२०१५-१६            ५,२९,६९३२०१६-१७            ११,३४,२००२०१७-१८            १७,४१,०६९२०१८-१९            २६,६४,०४१---------------------------------गेल्या दहा वर्षात आयोगाच्या परीक्षा विविध देणाऱ्या विद्यार्थी संख्येत  वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढली नाही. आयोगाला पुरेसे मनुष्यबळ दिले तरच ते परिणामकारकपणे काम करू शकते. त्यामुळे आढावा घेऊन आयोगाला पुरेसे मनुष्यबळ द्यायला हवे. - व्ही.एन. मोरे,माजी अध्यक्ष ,एमपीएससी

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार