शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 20:02 IST

MP Vishal Patil News: सविस्तर आकडेवारी आणि माहिती आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेसला समर्थन देणाऱ्या खासदारांनी म्हटले आहे.

MP Vishal Patil News: निर्मला सीतारामन यांनी सांगितले की १२ लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले असा त्याचा अर्थ होत नाही. दोन टॅक्स रिजिम आहेत. १२ लाखापर्यंत टॅक्स नसेल तर ४ स्लॅब का केले आहेत. महागाई खूप वाढली आहे. ज्या गोष्टी ३ लाखात भागायच्या आता त्यासाठीच १२ लाख लागत आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की, शासन आमच्या खिशातून पैसे घेत होते. आम्हाला परवडत नाही. ८ वर्षे सामान्य नागरिक बजेटकडे डोळे लावून पाहत असायचे, याची जाणीव आता निर्मला सीतारामन यांना झाली असावी. शेवटी त्यांना कळले आणि त्यांनी जाहीर केले. आतापर्यंत केलेल्या बजेटच्या ८ भाषणांपैकी सर्वांत छान भाषण झाले आहे. हे बजेट चांगले केले असले तरी ते नापास झालेले आहे. बजेट चांगले झाले आहे का, ते सविस्तर माहिती आल्यावर समजेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी दिली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही, ती जागा ठाकरे गटाला मिळाली. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. विशाल पाटील यांनी बजेटबाबत संयमित प्रतिक्रिया दिली. 

एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का

महाराष्ट्राने देशाला मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन दिले आहे. ३७ ते ३८ टक्के टॅक्स एकट्या महाराष्ट्राकडून देशाला जातो. अखंड देशातून एवढे टक्के टॅक्स देणारे महाराष्ट्र राज्य आहे. परंतु, बजेटमध्ये महाराष्ट्राचे नावही घेतले नाही. राज्यात सर्वांत मोठा विजय मिळाला. भाजपाला सर्वोत्तम स्ट्राइक रेट दिला. एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का, असा प्रश्न विशाल पाटील यांनी केला. 

दरम्यान, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. परंतु, अशी घोषणा केलीच नाही, असे आता फडणवीस म्हणत आहेत. कर्जमुक्ती होणार की नाही, हे माहिती नाही. जुनेच कर्ज फिटले नाही, तर नवीन कर्ज मिळणारच नाही, असा दावा विशाल पाटील यांनी केला. हे सरकार फसवे आहे. गोड-गोड बोलले आहेत. सविस्तर माहिती आली की चित्र स्पष्ट होईल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019congressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन