शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

“८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 20:02 IST

MP Vishal Patil News: सविस्तर आकडेवारी आणि माहिती आल्यावर चित्र स्पष्ट होईल, असे काँग्रेसला समर्थन देणाऱ्या खासदारांनी म्हटले आहे.

MP Vishal Patil News: निर्मला सीतारामन यांनी सांगितले की १२ लाखांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. १२ लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री केले असा त्याचा अर्थ होत नाही. दोन टॅक्स रिजिम आहेत. १२ लाखापर्यंत टॅक्स नसेल तर ४ स्लॅब का केले आहेत. महागाई खूप वाढली आहे. ज्या गोष्टी ३ लाखात भागायच्या आता त्यासाठीच १२ लाख लागत आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे की, शासन आमच्या खिशातून पैसे घेत होते. आम्हाला परवडत नाही. ८ वर्षे सामान्य नागरिक बजेटकडे डोळे लावून पाहत असायचे, याची जाणीव आता निर्मला सीतारामन यांना झाली असावी. शेवटी त्यांना कळले आणि त्यांनी जाहीर केले. आतापर्यंत केलेल्या बजेटच्या ८ भाषणांपैकी सर्वांत छान भाषण झाले आहे. हे बजेट चांगले केले असले तरी ते नापास झालेले आहे. बजेट चांगले झाले आहे का, ते सविस्तर माहिती आल्यावर समजेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस समर्थक खासदार विशाल पाटील यांनी दिली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सुमारे १ तास १४ मिनिटे चाललेल्या अर्थसंकल्पी भाषणामध्ये, युवा, शेतकरी, महिला, सेवाक्षेत्र, रोजगार, कर्ज आणि विशेष पॅकेज यासंबंधीच्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळाले नाही, ती जागा ठाकरे गटाला मिळाली. यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसला समर्थन दिले. विशाल पाटील यांनी बजेटबाबत संयमित प्रतिक्रिया दिली. 

एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का

महाराष्ट्राने देशाला मोठ्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन दिले आहे. ३७ ते ३८ टक्के टॅक्स एकट्या महाराष्ट्राकडून देशाला जातो. अखंड देशातून एवढे टक्के टॅक्स देणारे महाराष्ट्र राज्य आहे. परंतु, बजेटमध्ये महाराष्ट्राचे नावही घेतले नाही. राज्यात सर्वांत मोठा विजय मिळाला. भाजपाला सर्वोत्तम स्ट्राइक रेट दिला. एवढी ताकद देऊनही महाराष्ट्रावर एवढा राग का, असा प्रश्न विशाल पाटील यांनी केला. 

दरम्यान, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली. परंतु, अशी घोषणा केलीच नाही, असे आता फडणवीस म्हणत आहेत. कर्जमुक्ती होणार की नाही, हे माहिती नाही. जुनेच कर्ज फिटले नाही, तर नवीन कर्ज मिळणारच नाही, असा दावा विशाल पाटील यांनी केला. हे सरकार फसवे आहे. गोड-गोड बोलले आहेत. सविस्तर माहिती आली की चित्र स्पष्ट होईल, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019congressकाँग्रेसvishal patilविशाल पाटीलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनnirmala sitharamanनिर्मला सीतारामन