शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी दिलं वेगळंच कारण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ज्यांनी दिलाय त्यांचे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:52 IST

धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर हा राजीनामा दिला हे सरकारने सांगावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Supriya Sule on Dhananjay Munde Resign: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. मात्र आता या राजीनाम्यावरुन सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे. धनंजय मुंडे यांनी कोणत्या आधारावर हा राजीनामा दिला हे सरकारने सांगावे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदार आग्रही होती. संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. अखेर सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि मंगळवारी मुंडेंनी राजीनामा दिला. आजारी असल्याचे कारण देत मुंडेंनी राजीनामा दिल्याचे सांगितले. मात्र सुप्रिया सुळे यांनी यावरुनच सरकारला सवाल विचारला आहे.

"धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना कौटुंबिक हिंसाचार पीक विम्यामध्ये केलेला भ्रष्टाचार याचा कशाचाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी त्यांच्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला आणि सरकारला मला विनम्रपणे विचारायचं आहे की अजित पवार आणि छगन भुजबळ हे म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. त्यामुळे मला स्पष्टीकरण हवय की हा राजीनामा नैतिकतेवर दिला आहे की का स्वतःच्या तब्येतीमुळे दिला आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

"हे सर्व भयानक आहे. आज ८४ दिवस झाले आहेत या गोष्टीला. या प्रकरणातल्या चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे सर्व फोटो आधीच पाहिलेले असतील ना. फोटो पाहून या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस लागले," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी राजीनाम्यात काय म्हटलं?

"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं धनंजय मुंडेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

"धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे," अशी प्रतिक्रिया उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSupriya Suleसुप्रिया सुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवारSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीड