शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर, भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 11:23 IST

महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा, राऊतांचं वक्तव्य.

“देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षाही भयानक होताना दिसतंय. राजकीय विरोधकांना निरनिराळ्या प्रकरणांमध्ये गुंतवून अटक करणे, जामीन न मिळणे यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर बेफामपणे सुरू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड सारख्या राज्यांमध्ये हे सुरू आहे. निवडणुका जवळ येईल तसं हे वाढत जाईल. सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत, शिक्षणमंत्री म्हणून जगाला हेवा वाटेल असं काम त्यांनी केलंय. त्यांनी घेतलेला निर्णय असे निर्णय हे कॅबिनेटचे आहेत. खोटे आरोप, मोठ्यानं ओरडण्यासाठी त्यांच्या यंत्रणा आहेत. लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसतेय. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हाही यावर चर्चा झाली,” असं संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

“केंद्राला माझं एक आव्हान आहे तुमच्या पक्षात संत आणि महात्मेच आहेत. रोज तुमची शंभर प्रकरणं बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील. एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कोणी बुडवली, त्यांना साधी नोटीस पाठवली नाही. देशात आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावानं घोटाळा झाला, काय झालं? चौकशी सुरू करताच क्लिन चीट मिळाली,” असं राऊत म्हणाले. 

“२०२४ ला कोणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. ते याच पद्धतीनं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले तर तुम्हाला कोण वाचवणार. तुम्ही जो पायंडा पाडलाय तो अत्यंत घातक पायंडा आहे. या देशात असं कधी घडत नव्हतं. गेल्या सात वर्षांत आपल्या बाजूच्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि स्वच्छ करून बाजूला ठेवायचं काम सुरु आहे. महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा. आशिष शेलारांनी नगरविकास खात्यासंदर्भात याचिका केलीये ती वाचा. त्या खात्यानं केलेले भ्रष्टाचार काय आहेत? ती प्रकरणं दिसत नाहीत. फक्त विरोधकांची प्रकरणं दिसतायत हे अत्यंत गंभीर आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदे