शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चिन्ह गोठवल्याने शिवसेना पक्ष संपणार का? शरद पवारांनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 10:45 IST

शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता.

मुंबई: शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. त्यावरून आयोगाने दोन्ही गटाकडून आवश्यक कागदपत्रे मागवली. त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला. परंतु कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर कागदपत्रांच्या आधारे आयोगाने तात्पुरतं दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही असं स्पष्ट केले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  

"शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात येणार असं काही होणार याची मला खात्री होती. याचे मला आश्चर्य वाटले नाही, निर्णय कोण घेत हे मला माहित नाही. आता शिवसेनेने निवडणुकांना समोरे जायची तयारी अगोदर केली पाहिजे. याअगोदर मी स्वतं: वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, त्याचा काही तोटा होत नाही. लोक ठरवतात कोणाला निवडून द्यायचे. शिवसेना पक्ष यामुळे अजिबात संपणार नाही उलट पक्ष जोमाने पुन्हा वाढेल, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवार यांनी दिली.

खेळलेला डाव कधीही त्यांच्यावर उलटला जाऊ शकतो; राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

'या निर्णयाचा महाविकास आघाडीवरही कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडी कायम एकत्र राहणार आहे. शिवसेनेच्या नव्या नावावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना कंसात बाळासाहेब ठाकरे, असं नाव शरद पवार यांनी सुचविले. हे असं याअगोदर काँग्रेसमध्ये झाले आहे, याअगोदर इंदीरा गांधी यांच्या काळात झालेल्या दोन घटनांचे पवार यांनी यावेळी उदाहरण दिले. 

राष्ट्रवादीचा भाजपाला सूचक इशारा

शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. क्रास्टो यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' नव्हे, हे तर 'ऑपरेशन डिवाइड अँड रूल' होते. इंग्रजांची पॉलिसी वापरून एक हौशी मोहरा वापरला आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना व धनुष्य बाण गोठवले. पण भाजपने हे लक्षात ठेवावे, त्यांनी खेळलेला हा डाव कधी त्यांच्यावर देखील उलटला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. 

भाजपा कुठेही दिसणार नाहीनिवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. मी रात्रभर झोपलो नाही. देवा हे काय केलंस तू? यांचा बंदोबस्त कर देवा. ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी ते संपणार आहेत. निवडणूक आयोग यंत्रणा केंद्राच्या हातात आहे. हा लोकशाहीचा खून आहे. अंधेरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकून येणारच. साधा रिक्षावाल्याने कोट्यवधी रुपये छापले. उद्धव ठाकरेंनी केवळ हात वर केला. याचे परिणाम भयानक होतील. भाजपा कुठेही दिसणार नाही. एकनाथ शिंदे संपणार आहे असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना