शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:58 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) सरकारमध्ये गँगवॉर आहे. ज्याने मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय त्यांना माहिती आहे. गँगमध्येही गँगवॉर असायचे. शिंदे गटातही तेच गँगवॉर सुरू आहे. विधानसभेत मंत्री आणि आमदार एकमेकांना मारतात, धक्काबुक्की करतात हाच तुमचा विकास आहे. तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. महाराष्ट्रात विकासाचा गँगवॉर सुरू आहे ही तुमची व्याख्या असेल तर तुमच्या शब्दकोशातून विकासाची व्याख्या बदला असं पत्र मी आरएसएसला लिहिणार आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीभाजपासहदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून भाजपाचं सरकार आहे, त्यांनी केलेल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का?. ७० वर्ष जो विकास झालाय तो नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत झाला. मोदी-शाह यांच्या सरकारने काय विकास केलाय हे तुम्ही सांगावे. फक्त पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणेचा वापर करून आमदार खरेदी करणे आणि विरोधकांची सरकारे पाडणे हाच तुमचा विकास आणि धोरण असेल तर नक्की हे तुम्हीच केलंय. ७० हजार कोटी घोटाळा, आदर्श घोटाळा आणि भ्रष्टाचाराबद्दल मोदीजी बोलतात, पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन ते देश चालवतात हाच विकास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचं सरकार हे विरोधकांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर दबाव आणतात. उद्या आदर्श घोटाळा झालाच नव्हता असं भाजपा म्हणले. हाच विकास आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले. जर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत. दिल्लीत येण्याचा प्रयत्न करताय त्यांना रोखलं जाते. नितीन गडकरी अनुभवी नेते आणि स्पष्टवक्ते, ते खोटे बोलत नाही. त्यामुळे गडकरी जे बोलतायेत आणि जे बोललेत त्यात काही फरक नाही. उघडपणे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत असं राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक होईल, प्रकाश आंबेडकरही सहभागी होतील. आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी पुढे जाईल. इतकं पुढे जाईल की देशाच्या परिवर्तनात प्रकाश आंबेडकरांचे मोठे योगदान असेल. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही, संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. पुन्हा मोदी-शाह यांचे राज्य आले तर कष्टकरी सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय ते खरेच आहे असंही संजय राऊत बोलले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस