शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:58 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) सरकारमध्ये गँगवॉर आहे. ज्याने मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय त्यांना माहिती आहे. गँगमध्येही गँगवॉर असायचे. शिंदे गटातही तेच गँगवॉर सुरू आहे. विधानसभेत मंत्री आणि आमदार एकमेकांना मारतात, धक्काबुक्की करतात हाच तुमचा विकास आहे. तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. महाराष्ट्रात विकासाचा गँगवॉर सुरू आहे ही तुमची व्याख्या असेल तर तुमच्या शब्दकोशातून विकासाची व्याख्या बदला असं पत्र मी आरएसएसला लिहिणार आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीभाजपासहदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून भाजपाचं सरकार आहे, त्यांनी केलेल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का?. ७० वर्ष जो विकास झालाय तो नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत झाला. मोदी-शाह यांच्या सरकारने काय विकास केलाय हे तुम्ही सांगावे. फक्त पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणेचा वापर करून आमदार खरेदी करणे आणि विरोधकांची सरकारे पाडणे हाच तुमचा विकास आणि धोरण असेल तर नक्की हे तुम्हीच केलंय. ७० हजार कोटी घोटाळा, आदर्श घोटाळा आणि भ्रष्टाचाराबद्दल मोदीजी बोलतात, पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन ते देश चालवतात हाच विकास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचं सरकार हे विरोधकांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर दबाव आणतात. उद्या आदर्श घोटाळा झालाच नव्हता असं भाजपा म्हणले. हाच विकास आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले. जर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत. दिल्लीत येण्याचा प्रयत्न करताय त्यांना रोखलं जाते. नितीन गडकरी अनुभवी नेते आणि स्पष्टवक्ते, ते खोटे बोलत नाही. त्यामुळे गडकरी जे बोलतायेत आणि जे बोललेत त्यात काही फरक नाही. उघडपणे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत असं राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक होईल, प्रकाश आंबेडकरही सहभागी होतील. आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी पुढे जाईल. इतकं पुढे जाईल की देशाच्या परिवर्तनात प्रकाश आंबेडकरांचे मोठे योगदान असेल. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही, संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. पुन्हा मोदी-शाह यांचे राज्य आले तर कष्टकरी सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय ते खरेच आहे असंही संजय राऊत बोलले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस