शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:58 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) सरकारमध्ये गँगवॉर आहे. ज्याने मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय त्यांना माहिती आहे. गँगमध्येही गँगवॉर असायचे. शिंदे गटातही तेच गँगवॉर सुरू आहे. विधानसभेत मंत्री आणि आमदार एकमेकांना मारतात, धक्काबुक्की करतात हाच तुमचा विकास आहे. तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. महाराष्ट्रात विकासाचा गँगवॉर सुरू आहे ही तुमची व्याख्या असेल तर तुमच्या शब्दकोशातून विकासाची व्याख्या बदला असं पत्र मी आरएसएसला लिहिणार आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीभाजपासहदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून भाजपाचं सरकार आहे, त्यांनी केलेल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का?. ७० वर्ष जो विकास झालाय तो नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत झाला. मोदी-शाह यांच्या सरकारने काय विकास केलाय हे तुम्ही सांगावे. फक्त पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणेचा वापर करून आमदार खरेदी करणे आणि विरोधकांची सरकारे पाडणे हाच तुमचा विकास आणि धोरण असेल तर नक्की हे तुम्हीच केलंय. ७० हजार कोटी घोटाळा, आदर्श घोटाळा आणि भ्रष्टाचाराबद्दल मोदीजी बोलतात, पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन ते देश चालवतात हाच विकास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचं सरकार हे विरोधकांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर दबाव आणतात. उद्या आदर्श घोटाळा झालाच नव्हता असं भाजपा म्हणले. हाच विकास आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले. जर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत. दिल्लीत येण्याचा प्रयत्न करताय त्यांना रोखलं जाते. नितीन गडकरी अनुभवी नेते आणि स्पष्टवक्ते, ते खोटे बोलत नाही. त्यामुळे गडकरी जे बोलतायेत आणि जे बोललेत त्यात काही फरक नाही. उघडपणे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत असं राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक होईल, प्रकाश आंबेडकरही सहभागी होतील. आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी पुढे जाईल. इतकं पुढे जाईल की देशाच्या परिवर्तनात प्रकाश आंबेडकरांचे मोठे योगदान असेल. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही, संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. पुन्हा मोदी-शाह यांचे राज्य आले तर कष्टकरी सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय ते खरेच आहे असंही संजय राऊत बोलले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस