शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:58 IST

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) सरकारमध्ये गँगवॉर आहे. ज्याने मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय त्यांना माहिती आहे. गँगमध्येही गँगवॉर असायचे. शिंदे गटातही तेच गँगवॉर सुरू आहे. विधानसभेत मंत्री आणि आमदार एकमेकांना मारतात, धक्काबुक्की करतात हाच तुमचा विकास आहे. तर विकासाची व्याख्या बदलावी लागेल. महाराष्ट्रात विकासाचा गँगवॉर सुरू आहे ही तुमची व्याख्या असेल तर तुमच्या शब्दकोशातून विकासाची व्याख्या बदला असं पत्र मी आरएसएसला लिहिणार आहे अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीभाजपासहदेवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणाले की, गेल्या १० वर्षापासून भाजपाचं सरकार आहे, त्यांनी केलेल्या कामाबद्दल देवेंद्र फडणवीस सांगू शकतात का?. ७० वर्ष जो विकास झालाय तो नरसिंह राव ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत झाला. मोदी-शाह यांच्या सरकारने काय विकास केलाय हे तुम्ही सांगावे. फक्त पैशाच्या ताकदीवर, तपास यंत्रणेचा वापर करून आमदार खरेदी करणे आणि विरोधकांची सरकारे पाडणे हाच तुमचा विकास आणि धोरण असेल तर नक्की हे तुम्हीच केलंय. ७० हजार कोटी घोटाळा, आदर्श घोटाळा आणि भ्रष्टाचाराबद्दल मोदीजी बोलतात, पण त्याच भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन ते देश चालवतात हाच विकास आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुमचं सरकार हे विरोधकांवर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करतात आणि त्यांच्यावर दबाव आणतात. उद्या आदर्श घोटाळा झालाच नव्हता असं भाजपा म्हणले. हाच विकास आहे. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले. जर शेतकऱ्यांना नुकसान  भरपाई मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्या करतायेत. दिल्लीत येण्याचा प्रयत्न करताय त्यांना रोखलं जाते. नितीन गडकरी अनुभवी नेते आणि स्पष्टवक्ते, ते खोटे बोलत नाही. त्यामुळे गडकरी जे बोलतायेत आणि जे बोललेत त्यात काही फरक नाही. उघडपणे शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. शेतकऱ्यांच्या मागण्या चुकीच्या नाहीत असं राऊतांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक होईल, प्रकाश आंबेडकरही सहभागी होतील. आंबेडकरांसोबत महाविकास आघाडी पुढे जाईल. इतकं पुढे जाईल की देशाच्या परिवर्तनात प्रकाश आंबेडकरांचे मोठे योगदान असेल. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. ते लोकशाही, संविधानाचे प्रमुख चौकीदार आहेत. पुन्हा मोदी-शाह यांचे राज्य आले तर कष्टकरी सामान्य माणसाच्या घरावरही धाडी पडतील असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय ते खरेच आहे असंही संजय राऊत बोलले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस