शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 10:52 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून तिथून त्यांनी मोदी-शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नाशिक - आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. २४० खासदार एकत्रित संसदेत प्रवेश करतील. प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा संदेश घेऊन प्रवेश करणार आहेत. मोदी-शाह आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला विरोधी पक्ष काय असतो हे कळेल असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेली १० वर्ष भाजपाने विरोधी पक्ष चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष प्रचंड ताकद घेऊन संसदेत जातोय. मोदी-शाह यांच्यासमोर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. काँग्रेसचे १०० पेक्षा जास्त खासदार, आम्ही सगळे मिळून २४० खासदार हे २४० चे २७५ कधी होतील हे मोदी-शाहांना कळणार सुद्धा नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोधक एकत्र आवाज उचलू. आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी-शाहांचा आवाज चालणार नाही. विरोधकांच्या २४० इंडिया आघाडीच्या खासदारांचा आवाज संसदेत चालणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं तर निवडणूक आयोग ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे. त्यामुळे त्यांना पैसेवाटपाचे व्हिडिओ दिसत नाहीत असंही राऊतांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात

दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरीही हे सरकार निर्लज्जपणे मोदी-शाहांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आम्ही सगळ्यांनी बांबू घातला आहे. तो अजून निघाला नाही. त्यामुळे स्वप्नातही त्यांना बांबू दिसतोय एवढा आत गेलेला आहे. विधानसभेला हा बांबू आरपार जाईल. याच बांबूचे फटके लोक या गद्दारांना रस्त्यारस्त्यावर मारतील असा घणाघात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.

आमदारांना निधी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या

महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना निधी द्या. तेलंगणात तिथल्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहे. याबाबत मु्ख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर तो आम्ही विधानसभेत घालू असंही संजय राऊतांनी म्हटलं.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदे