शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2023 10:58 IST

ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले.

मुंबई - उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष घातलंय. तालुकापातळीवर शिवगर्जना सभा झाल्या, रोड शो झाले. लोकांचा प्रचंड सहभाग होता. आजची खेडची सभा ज्यासभेला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. कोकणातील अतिविराट ही सभा असेल. कोकण हा कायम शिवसेनेचा गड, पाठिराखा राहिलाय. शिवसेनेच्या संघर्षात कोकणाचं योगदान मोठे राहिले आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवलीय. खेडसारख्या सभा राज्यातील अनेक भागात होतील. उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. खेडनंतर दुसरी सभा मालेगावला होईल त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत. शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे. कागदावर नाव, चिन्ह मिळाले परंतु शिवसेनेची जनता मिळाली नाही. जनता सुपूर्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अनेक कार्यकर्ते, नेते शिवसेनेत प्रवेश करतायेत हे सत्य आहे. संजय कदम हे मूळचे शिवसैनिकच आहेत. खेड आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी या कार्यकर्त्यांचा फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

काश्मिरी पंडिताच्या हत्येचा वापर राजकीय फायद्यासाठी संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची पुलवामाच्या बाजारात हत्या झाली. सरकारी कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारले जाते. शेकडो पंडीत आजही आक्रोशाने जम्मूत रस्त्यावर बसले आहेत. पंजाबमध्ये काही ठिकाणी खलिस्तानी भूत उभे राहताना दिसते. ही जबाबदारी केवळ राज्य सरकारवर नाही तर सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे केंद्राची जबाबदारी तितकीच आहे. भाजपानं संवेदनशीलतेचा राजकारणासाठी उपयोग केला. काश्मिरी पंडित मेल्यानंतर त्याचा राजकीय वापर भाजपा करते. हे कितीवेळ चालणार? असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

भाजपा-शिंदेच्या आशीर्वाद यात्रेवर टीकाभाजपानं अशा यात्रा काढून काही उपयोग नाही. आमच्या शिवगर्जना यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणून ते मूळापासून हादरले आहे. शिवसेनेच्या जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. पैसाच्या जोरावर भाजपा-शिंदे गट यात्रा काढणार आहे. तुम्ही या यात्रा काढा ज्यामुळे तुमची बेईमानी आणि गद्दारी लोकांसमोर पोहचेल असं सांगत संजय राऊतांनी भाजपाच्या आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे. ...म्हणून विरोधकांनी पत्र लिहिलंपंतप्रधान नरेंद्र मोदी घटनात्मक पदावर बसलेत. त्यामुळे ९ विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी सीबीआय, ईडीच्या तपास यंत्रणेचा गैरवापर होतोय यासाठी पत्र पाठवले आहे. मोदींच्या संमतीने हे घडतेय हे खरे असले तरी विरोधी पक्ष गप्प बसला नाही हे जनतेला माहिती पडावं म्हणून विरोधकांनी पत्र पाठवले आहे असं राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे