शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:14 IST

युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द पत्रक काढून केला आहे. मात्र हा निर्णय जलील यांचा असून, जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. तर वंचित सोबत युती तोडल्याचा आरोप जलील यांच्यावर होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी मौन बाळगले असल्याने जलील एकाकी पडले असल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. तर खासदार झाल्यामुळे जलील यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यानी केला होता. त्याचबरोबर युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.

तर ओवेसी यांना न विचारता जलील यांनी युती तोडल्याचे आरोप होत असताना, जलील यांनी हे आरोप फेटाळून लावली आहेत. मला पक्षाचे प्रमुख ओवेसी यांनी दिलेल्या आदेशानुसार मी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र जलील यांच्यावर युती तोडण्याचे आरोप होत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोणतेही प्रतिकिया दिली नसल्याने, त्यांच्या मौनाने खासदार जलील हे एकाकी पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे ९८ जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे बोलले जाता असताना, वंचितकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एमआयएमने फक्त १७ जागा मागितल्याचा खुलासा वंचितकडून करण्यात आला आहे. मात्र जलील यांच्या युती तोडण्याच्या घोषणेनंतर अनेक घडमोडी घडत असताना असदुद्दीन ओवेसी यांची कोणतेही प्रतिकिया यावर आली नाही. त्यामुळे ओवेसी यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.