शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

वंचित-एमआयएम युती: ओवेसींच्या मौनाने इम्तियाज जलील एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 13:14 IST

युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला असताना, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यात युती होणार नसल्याचा खुलासा खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसिध्द पत्रक काढून केला आहे. मात्र हा निर्णय जलील यांचा असून, जोपर्यंत एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी सांगत नाहीत तोपर्यंत युती कायम असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. तर वंचित सोबत युती तोडल्याचा आरोप जलील यांच्यावर होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी मौन बाळगले असल्याने जलील एकाकी पडले असल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. त्यांनी फक्त आठ जागांची ऑफर दिली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत, असं जलील यांनी जाहीर केले होते. तर खासदार झाल्यामुळे जलील यांची राजकीय महत्वाकांक्षा वाढली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सचिन माळी यानी केला होता. त्याचबरोबर युती तोडण्याचा निर्णय जलील यांचा असल्याचा आरोप सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता.

तर ओवेसी यांना न विचारता जलील यांनी युती तोडल्याचे आरोप होत असताना, जलील यांनी हे आरोप फेटाळून लावली आहेत. मला पक्षाचे प्रमुख ओवेसी यांनी दिलेल्या आदेशानुसार मी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र जलील यांच्यावर युती तोडण्याचे आरोप होत असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी कोणतेही प्रतिकिया दिली नसल्याने, त्यांच्या मौनाने खासदार जलील हे एकाकी पडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे ९८ जागांचा प्रस्ताव दिला असल्याचे बोलले जाता असताना, वंचितकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एमआयएमने फक्त १७ जागा मागितल्याचा खुलासा वंचितकडून करण्यात आला आहे. मात्र जलील यांच्या युती तोडण्याच्या घोषणेनंतर अनेक घडमोडी घडत असताना असदुद्दीन ओवेसी यांची कोणतेही प्रतिकिया यावर आली नाही. त्यामुळे ओवेसी यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.