बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने मन्यारखेडा गावावर शोककळा
By Admin | Updated: April 23, 2017 19:43 IST2017-04-23T19:12:12+5:302017-04-23T19:43:49+5:30
ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़

बहीण-भावाच्या अपघाती मृत्यूने मन्यारखेडा गावावर शोककळा
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 23 - लहान बहिणीला आळंदीला सोडून पुन्हा जळगावकडे परतणा:या मन्यारखेडा येथील बहिण-भावाचा ट्रॅव्हलमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगावजवळ घडली़ या घटनेने मन्यारखेडा गावावर शोककळा पसरली आह़े कुटुंबांची जबाबदारी सांभाळणा:या मुला आणि मुलीच्या मृत्यूने वडील सुरेश मराठे यांचा आधार हरपला असून पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता़
सुरेश वामन मराठे हे सेवानिवृत्त बसचालक आहेत़ सात वर्षापूर्वी ते परिवहन मंडळातून सेवानिवृत्त झाल. तीन मुली, एक मुलगा, जावई व नातवंडे असा त्यांचा परिवार आह़े खाजगी गाडीवर चालक म्हणून काम करून ते कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात़ प्रतिभा, तुलसी या दोघा मुलींचे लग्न झाले असून त्या सासरी नांदत आहेत़ मुलगा गजानन हा वाहनाच्या शोरूममध्ये चालक म्हणून काम करून कुटुंबास हातभार लावत होता़
लहान मुलगी पोलीस भरतीला आली होती
मराठे यांची लहान मुलगी तुलसी ही आळंदीला राहत़े पोलीस व्हायची इच्छा असल्याने तिने पोलीस भरतीसाठी जळगावात अर्ज केला होता व भरतीसाठी तुलसी दीड महिन्यांपूर्वी वडिलांकडे जळगावला आली होती़ मैदानी चाचणी, लेखी परीक्षेदरम्यान तुलसीच्या 11 महिन्यांचा चिमुकला, मानसचा मोठी बहिण अरूणा हिने सांभाळ केला होता़ पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याने तुलसीला सोडण्यासाठी 15 रोजी मोठी बहिण अरूणा व भाऊ गजानन हे आळंदीला गेले होत़े
साखर झोपेतच दोघा बहिण भावांचा करूण अंत
22 रोजी रात्री गजानन व अरूणा मराठे हे दोघे ट्रॅव्हल्सने (एम एच 19 वाय 8001) पुणे येथून जळगावकडे परत येत होत़े दोघे बहिण भाऊ ट्रॅव्हल्सच्या मागील सीटवर बसले होत़े याच सीटखाली ट्रॅव्हलची दोन चाकेही ठेवलेली होती़ गंगापूर तालुक्यातील ढोरेगावनजीक गतिरोधकावर जोरदार दणक्याने दोघा चाकांच्या वजनामुळे तसेच बहिण भाऊ बसलेले सीट जीर्ण पत्र्यातून जागीच खचल़े याच मागाच्या चाकात आल्याने गजानन व अरूणा यांचा जागीच मृत्यू झाला़
जळगावजवळील मन्यारखेडा या गावात ही वार्ता समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संध्याकाळी गावात दोघांचेही मृतदेह आणल्यानंतर सर्वाना शोक अनावर झाला. या वेळी पोटच्या गोळ्य़ांचे मृतदेह पाहून वडील शोकसागरात बुडून त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. बहीण-भावाची अंत्ययात्रा सोबतच निघाल्याचे दृष्य पाहून गावक:यांना आश्रू आवरता आले नाही.