शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

'सर्वाधिक आमदार-खासदार-मुख्यमंत्री मराठा समाजाचे; मग आरक्षणाची काय गरज?' -राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:33 IST

'संतोष देशमुखला पैशाच्या वादातून मारले; वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध? जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका.'

Raj Thackeray Gudhi Padwa Melava : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या गुढीपाडवा मेळाव्यातून संतोष देशमुख हत्याकांडासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, 'संतोष देशमुखांना किती घाणेरड्या पद्धतीने मारले गेले. हे सगळे कशातून झाले? विंडमील, राख, खंडणीच्या पैशातून...मी आजपर्यंत ऐकले होते की, राखेतून फिनिक्स उभारी घेतो, पण बीडमध्ये राखेतून गुंड उभारतोय. विषय होता पैशाचा. वाल्मिक कराडने खंडणी मागितली, संतोष देशमुखने विरोध केला, त्याला संपवले. त्याच्या जागे दुसरा कोणी असता, तरी हेच झाले असते. पण, आपण लेबल काय लावले, वंजाऱ्याने मराठ्याला मारले. यात वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध?' असा थेट सवाल प्रमुख राज ठाकरेंनी केला. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज?'आपण कशात गुंतवून पडतोय? तुम्हाला गुंतवले गेले आहे. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पाहू नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे पाहू नका. आता दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. पण त्याकडे पाहू नका. आपल्याकडे रोजगार निर्माण होत नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुल-मुली मराठवाडा सोडून पुण्यात येतात, त्याकडे पाहू नका. आपण कशात अडकलोय, जातीपातीत! कोणी जातीचे भले केले नाही. या महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागते? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त मतदानासाठी जातीचा उपयोग करतात,' असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका...राज ठाकरे पुढे म्हणतात, 'निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू म्हणाले होते, पण काल अजित पवार म्हणाले, 30 तारखेच्या आत पैसे भरा, कर्जमाफी होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर तु्म्ही वाटेल ते बोलणार आणि त्यानंतर माघार घेणार. राज्यातील जनतेला मला विचारायचे आहे, तुम्ही मतदान करता कसे? लाडकी बहीण योजनाही बंद होणार. सरकारकडे पैसेच नाहीत. कर्ज काढून दिवाळी साजरी करायची कशाला? राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. पण, राज्यातील मुला-मुलींना कळत नाही, त्यांना जातीत गुंतवले जातेय. मूळ प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. तुम्ही मूळ प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरले पाहिजे. आपलेच लक्ष नसेल, तर त्यांचे फावणारच आहे. तु्म्ही सगळे जातीचे भेद बाजुला सारुन मराठी म्हणून उभे राहिले पाहिजे. तामिळनाडू, केरळात हिंदीला नकार देतात आणि आपण लोटांगण घालतो. आम्हालाच समजत नाही काय करायचे...इतका भांबावलेला मराठी माणूस मी कधीच पाहिला नाही.' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण