शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

'सर्वाधिक आमदार-खासदार-मुख्यमंत्री मराठा समाजाचे; मग आरक्षणाची काय गरज?' -राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:33 IST

'संतोष देशमुखला पैशाच्या वादातून मारले; वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध? जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका.'

Raj Thackeray Gudhi Padwa Melava : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या गुढीपाडवा मेळाव्यातून संतोष देशमुख हत्याकांडासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, 'संतोष देशमुखांना किती घाणेरड्या पद्धतीने मारले गेले. हे सगळे कशातून झाले? विंडमील, राख, खंडणीच्या पैशातून...मी आजपर्यंत ऐकले होते की, राखेतून फिनिक्स उभारी घेतो, पण बीडमध्ये राखेतून गुंड उभारतोय. विषय होता पैशाचा. वाल्मिक कराडने खंडणी मागितली, संतोष देशमुखने विरोध केला, त्याला संपवले. त्याच्या जागे दुसरा कोणी असता, तरी हेच झाले असते. पण, आपण लेबल काय लावले, वंजाऱ्याने मराठ्याला मारले. यात वंजारी आणि मराठ्यांचा काय संबंध?' असा थेट सवाल प्रमुख राज ठाकरेंनी केला. ते मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज?'आपण कशात गुंतवून पडतोय? तुम्हाला गुंतवले गेले आहे. हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पाहू नका, शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे पाहू नका. आता दररोज सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. पण त्याकडे पाहू नका. आपल्याकडे रोजगार निर्माण होत नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. असंख्य मुल-मुली मराठवाडा सोडून पुण्यात येतात, त्याकडे पाहू नका. आपण कशात अडकलोय, जातीपातीत! कोणी जातीचे भले केले नाही. या महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावे लागते? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त मतदानासाठी जातीचा उपयोग करतात,' असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

लाव रे तो व्हिडीओ; राज ठाकरेंनी गंगेच्या प्रदूषणावर बोट ठेवले, कुंभमेळ्यावरही थेट बोलले...

जाती-पातीच्या राजकारणात अडकू नका...राज ठाकरे पुढे म्हणतात, 'निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू म्हणाले होते, पण काल अजित पवार म्हणाले, 30 तारखेच्या आत पैसे भरा, कर्जमाफी होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर तु्म्ही वाटेल ते बोलणार आणि त्यानंतर माघार घेणार. राज्यातील जनतेला मला विचारायचे आहे, तुम्ही मतदान करता कसे? लाडकी बहीण योजनाही बंद होणार. सरकारकडे पैसेच नाहीत. कर्ज काढून दिवाळी साजरी करायची कशाला? राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवला पाहिजे. पण, राज्यातील मुला-मुलींना कळत नाही, त्यांना जातीत गुंतवले जातेय. मूळ प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नाही. तुम्ही मूळ प्रश्नांवरुन सरकारला धारेवर धरले पाहिजे. आपलेच लक्ष नसेल, तर त्यांचे फावणारच आहे. तु्म्ही सगळे जातीचे भेद बाजुला सारुन मराठी म्हणून उभे राहिले पाहिजे. तामिळनाडू, केरळात हिंदीला नकार देतात आणि आपण लोटांगण घालतो. आम्हालाच समजत नाही काय करायचे...इतका भांबावलेला मराठी माणूस मी कधीच पाहिला नाही.' 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण