शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अवकाळीच्या कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:29 IST

कडपा ओल्या झाल्याने पीक जाणार : कृषी विभागाचे सर्वेक्षणाचे आदेश, पीक विम्याची मदत होणार

गोंदिया : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीपातील कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका बसला. बांध्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागणार आहे. सोमवारी (दि.२८) सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे खरीपातील धान पिकांवर अवकाळी पावसाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडत असल्याने ऐवढा पाऊस धानपिकासाठी अनुकुल मानला जातो.त्यामुळे धान हेच या भागातील मुख्य पीक आहे.यंदा सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलैनंतर पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा बंफर धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. दिवाळीपूर्वी हलका धान निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. जिल्ह्यातील बºयाच शेतकºयांना पंधरा ते वीस दिवसांपूर्वीपासून हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली होती. कापणी केलेल्या धानाच्या कडपा तश्याच बांध्यामध्ये पडून होत्या. मात्र मागील आठवड्यात आणि शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्या. काही भागात बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे धान पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे १० ते १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा कापणी केलेला धानाला बसला आहे.त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. याची माहिती पीक विमा कंपन्याना सुध्दा दिली आहे. - नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.पीक विमाधारक शेतकºयांना मिळणार नुकसान भरपाईपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत यंदा जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. विमा कपनीच्या तरतूदीनुसार ज्या पीक विमाधारक शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल त्यांना शासनाकडून पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे.ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोकामागील चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.तर काही भागात अवकाळी पाऊस सुध्दा झाला. ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हाती आलेले पीक तर गमवावे लागणार नाही ना अशी भिती शेतकºयांना सतावित आहे.

टॅग्स :Rainपाऊस