शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अवकाळीच्या कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 06:29 IST

कडपा ओल्या झाल्याने पीक जाणार : कृषी विभागाचे सर्वेक्षणाचे आदेश, पीक विम्याची मदत होणार

गोंदिया : जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीपातील कापणी केलेल्या धानाला सर्वाधिक फटका बसला. बांध्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागणार आहे. सोमवारी (दि.२८) सकाळपासून ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे खरीपातील धान पिकांवर अवकाळी पावसाचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.

धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यंदा १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ११५० मि.मी.पाऊस पडत असल्याने ऐवढा पाऊस धानपिकासाठी अनुकुल मानला जातो.त्यामुळे धान हेच या भागातील मुख्य पीक आहे.यंदा सुरूवातीला पाऊस लांबला होता. मात्र जुलैनंतर पावसाने सरासरी गाठल्याने धान पिकाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा बंफर धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. दिवाळीपूर्वी हलका धान निघतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. जिल्ह्यातील बºयाच शेतकºयांना पंधरा ते वीस दिवसांपूर्वीपासून हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली होती. कापणी केलेल्या धानाच्या कडपा तश्याच बांध्यामध्ये पडून होत्या. मात्र मागील आठवड्यात आणि शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्या. काही भागात बांध्यामध्ये पाणी साचल्याने धान सडला. त्यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे धान पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला जाणार आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे १० ते १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा कापणी केलेला धानाला बसला आहे.त्यामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या धान पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व तालुका कृषी अधिकाºयांना दिले आहे. याची माहिती पीक विमा कंपन्याना सुध्दा दिली आहे. - नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया.पीक विमाधारक शेतकºयांना मिळणार नुकसान भरपाईपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत यंदा जिल्ह्यातील ७० हजार शेतकºयांनी पीक विमा काढला. विमा कपनीच्या तरतूदीनुसार ज्या पीक विमाधारक शेतकºयांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असेल त्यांना शासनाकडून पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती आहे.ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोकामागील चार पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.तर काही भागात अवकाळी पाऊस सुध्दा झाला. ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे हाती आलेले पीक तर गमवावे लागणार नाही ना अशी भिती शेतकºयांना सतावित आहे.

टॅग्स :Rainपाऊस