शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

सर्वाधिक पीक विमा मराठवाड्यात नुकसानभरपाईचे प्रमाण मात्र कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 02:06 IST

विदर्भातही भरपाई घटली; दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फटका

योगेश बिडवईमुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्रातील ४६ टक्के शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारी नुकसान भरपाई ही जेमतेम १० टक्के इतकीच म्हणजे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत कमी मिळत असल्याची धक्कादायक माहिती पुणे येथील ‘द युनिक फाउंडेशन’ या संशोधन संस्थेने राज्यात पीक विमा योजनेच्या केलेल्या अभ्यासात आढळून आली आहे. राज्यात सर्वाधिक पीक विमा मराठवाडा व त्यानंतर विदर्भातील शेतकरी काढतात, मात्र या दोन्ही विभागात नुकसान भरपाईच्या वितरणाचे प्रमाण मात्र कमी राहिले आहे. उलट खरीप २०१६ व २०१७ च्या तुलनेत नुकसान भरपाई वितरीत करण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.

मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्हे ही दुष्काळी आहेत. पण याच विभागात नुकसान भरपाई वितरणाचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. हाच मुद्दा राज्य शासन, पीक विमा कंपनी व शेतकºयांमधील संघर्षाचा मुद्दा बनला आहे. राज्य शासनाने दुष्काळी तालुक्यात नुकसान भरपाई देण्याचा दर ९० टक्के इतका ठेवला तर शेतकºयांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल, असे द युनिक फाउंडेशनच्या अहवालात नोंद केले आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना २०१६ साली नव्या रुपात अस्तित्त्वात आली. यात खरीप पिकासाठी २ टक्के तर रब्बी पिकासाठी १.५ टक्के इतका विमा हप्ता दर ठेवण्यात आला. पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. मागील पाच हंगामात (खरीप २०१६ ते खरीप २०१८ पर्यंत) राज्यातील ३ कोटी ८६ लाख २ हजार ४५२ शेतकºयांनी ११,५८९.६५ कोटी रुपयांचा पिकांचा विमा उतरवला आहे. तर शेतकºयांना ६,८१६.७७ कोटी (खरीप २०१८ पर्यंतची आकडेवारी) इतक्या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले असल्याचे या अभ्यासात आढळले आहे.

महाराष्ट्रात खरीप २०१६ मध्ये पीक विमा उतरवणाºया शेतकºयांची संख्या एक कोटीच्या वर होती. पण नुकसान भरपाई मिळण्याचेप्रमाण कमी असल्याने खरीप २०१७ व खरीप २०१८ मध्ये ही संख्या अनुक्रमे सुमारे १३ लाख व ९१ लाख अशी घट झाली.नुकसान भरपाई तब्बल एका वर्षाने मिळत असल्यानेही शेतकरी पीक विमा काढण्यास इच्छुक नसतात, असे अभ्यासात आढळल्याचे द युनिक फाऊंडेशनच्या संचालक मुक्ता कुलकर्णी व कार्यकारी संचालक विवेक घोटाळे यांनी सांगितले. शासनाच्या धोरणाची चिकित्सा करून त्यातून योजनेतील त्रुटी दूर होण्यासाठी हा अभ्यास प्रकल्प राबविल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील विभागवार एकुण पाच जिल्ह्यांतील तालुक्यात या योजनेच्या अंमलबजावणीचा अभ्यास केला. त्यात ७९१ शेतकºयांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मराठवाडा व विदर्भात या योजनेचा अपेक्षित फायदा होताना दिसलेला नाही. - केदार देशमुख, प्रकल्प संचालक, द युनिक फाऊंडेशन

हप्ता भरला साडेअकरा हजार कोटींचा, भरपाई मिळाली साडेसहाशे कोटी खरीप २०१६ पासून खरीप २०१८ पर्यंतच्या पाच हंगामात पीक विम्यापोटी तब्बल ११,५८९.२२ कोटी रूपये हप्ता भरण्यात आला. तर पाच हंगामात शेतकºयांना ६,८१६.७६ कोटी रुपये एकूण नुकसान भरपाई मिळाली.

टॅग्स :Farmerशेतकरी