शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सर्वाधिक लाचखोर 'या' जिल्ह्यातून जेरबंद; काेकण परिक्षेत्रात ६६ सरकारी नोकर जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 23:41 IST

लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते.

ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने ठाणे (कोकण) परिक्षेत्रात राबविलेल्या कारवाईमध्ये १ जानेवारी ते १० डिसेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीत ४४ सापळे लावण्यात आले. यात ६६ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहा विभागांतील सर्वाधिक २५ गुन्हे ठाण्यात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लाच देऊ नये आणि कोणी सरकारी कर्मचाऱ्याने ती घेऊ नये, असे वारंवार आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केले जाते. तरीही अगदी क्षुल्लक कामांसाठीही सामान्य व्यक्तींची अडवणूक होते. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा विभागांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. २०१९ मध्ये कोकण परिक्षेत्रात १०९ गुन्हे दाखल झाले होते. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ५३ टक्क्यांनी ही घट झाल्याचे बोलले जात आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जनजागृतीसह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यंदा २०२० मध्ये ठाणे परिक्षेत्रात एकूण ४३ सापळे लावण्यात आले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये वर्षभरात ६६ लाचखोर सापळ्यात अडकले. यामध्ये २५ लाचखोरांना ठाण्यातून अटक झाली. त्यापाठोपाठ पालघर विभागात सहा, नवी मुंबई आणि रायगड विभागात प्रत्येकी चार, रत्नागिरीत तीन आणि सिंधुदुर्गमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली. यंदाही लाचखोरीत महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभाग अव्वल क्रमांकावर होते. त्यापाठोपाठ पोलीस कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०२० मध्ये विभागनिहाय कारवाईठाणे          २५पालघर          ६नवी मुंबई      ४रायगड          ५रत्नागिरी        ३सिंधुदुर्ग          १एकूण         ४४एकूण अटक      ६६

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस