शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

राज्यात एक लाखाहून अधिक सिझेरियन प्रसूती; तीन महिन्यांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 7:44 AM

नैसर्गिक कारणांसह न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही घेतला जातो निर्णय

- स्नेहा मोरे मुंबई : मागील काही वर्षांत राज्यात ‘^सिझेरियन’ (सी-सेक्शन) प्रसूतींच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळत असून यंदा एप्रिल ते जून या काळात एकूण प्रसूतींपैकी २२.६ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या आहेत. लग्नाचे सर्वसाधारण वय वाढल्यामुळे जोडप्यांनी बाळासाठी उशिरा प्रयत्न सुरू करणे, तसेच जीवनशैलीतील बदलांच्या विपरीत परिणामांमुळे प्रसूतीत अडचणी संभवणे ही याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. परंतु याबरोबरच न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही प्रसूतीबाबत कोणताही धोका न पत्करण्याकडे डॉक्टरांचा कल असल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१८-१९ मध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण एकूण ९४ हजार ८६३ इतके होते. मात्र एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरकारी रुग्णालयांमध्ये ४२ हजार ८९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५७ हजार ५६७ इतक्या सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. तीन महिन्यांत राज्यात अशा प्रकारे १ लाख ४६१ प्रसूती झाल्या. राज्यात पुण्यात सर्वाधिक १२ हजार ४३ सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. त्यात सरकारी रुग्णालयात ४४६७ आणि खासगी रुग्णालयांत ७५७६ प्रसूती झाल्या. त्याखालोखाल मुंबईत १०,९१४ सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या. यात सरकारी रुग्णालयांत ४९२९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५९८५ असे प्रमाण आहे.दहा वर्षांपूर्वी सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण सर्वसाधारणपणे २० टक्के होते, ते आता ३५ टक्के झाल्याचे ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. प्रशांत सरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अधिक वयातील प्रसूतींचे प्रमाण आता वाढले आहे. वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्यांमध्येही वाढ होत असून त्यांच्या बाबतीत प्रसूतीबद्दल अधिक धोका पत्करला जात नाही. जोडप्यांना हल्ली सहसा एक किंवा दोनच मुले असल्यामुळे त्या बाळांच्या वेळी धोका नको असा जोडप्यांचाही कल असतो. पूर्वी गरोदरपणात मधुमेहासारखे आजार असण्याचे प्रमाण कमी दिसायचे. आता तेही वाढले असून अशा महिलांच्या बाबतीतही प्रसूतीत धोका पत्करला जात नाही. याशिवाय न्यायवैद्यकीय खटला संभवण्याच्या दबावामुळेही काही वेळा डॉक्टरांकडून सिझेरियन प्रसूती करण्याकडे कल राहतो.ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शहनाज तारवाला यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, विविध वैद्यकीय तपासण्या उपलब्ध झाल्यामुळे बाळ नैसर्गिक प्रसूतीचा ताण सहन करू शकेल का, अशा गोष्टींची कल्पना आधी येऊ शकते. प्रसूती सिझेरियन करण्यामागे काही कारणे बाळासाठीची तर काही आईसाठीची असतात. शिवाय बाळाच्या आरोग्यास धोका असल्याचे तपासण्यांवरून लक्षात आल्यास धोका पत्करला जात नाही. अशा वेळी न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही डॉक्टरांकडून सिझेरियनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.घरगुती प्रसूतींचे प्रमाण कमीराज्यात २०१८-१९ या वर्षात एप्रिलते जून या कालावधीत ३,५३०घरगुती प्रसूती झाल्या होत्या.यंदा मात्र मागील तीन महिन्यांत राज्यात २,७७३ घरगुती प्रसूती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती प्रसूती झाल्या असून त्यांची संख्या यंदा १,१९१ असून गेल्या वर्षी ती १३४१ इतकी होती.‘आॅन डिमांड’ प्रसूतीकाही दाम्पत्य मुहूर्त पाहून, तसेच आपल्या सोयीनेही प्रसूतीचा निर्णय घेताना दिसतात. परदेशात ‘आॅन डिमांड’ प्रसूतीचे प्रमाण ५ टक्के, तर आपल्याकडे ते १ ते २ टक्के असल्याचे डॉ. तारवाला यांनी सांगितले.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी