शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपासून अधिक मासारंभ

By admin | Updated: June 16, 2015 03:17 IST

बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून, गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

ठाणे : बुधवार म्हणजे १७ जूनपासून अधिक आषाढ महिन्याचा प्रारंभ होत असून, गुरुवारी १६ जुलै रोजी अधिक आषाढ महिना संपणार असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात, तर आपले सण, व्रतवैकल्ये चंद्रावर अवलंबून असतात. सण, व्रतवैकल्ये ठरावीक ऋतूत येण्यासाठी चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळेच अधिक मास येत असतो. अधिक मासानंतर नीज मास येत असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. त्यालाच सौरवर्ष म्हटले जाते. चंद्राला पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता ३५४ दिवस ८ तास ४८ मिनिटे आणि २४ सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे दरवर्षी चांद्र-सौर वर्षाच्या काळात सुमारे ११ तिथींचा फरक पडत जातो. सुमारे तीन वर्षांनी अधिक महिना येतो. एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला की, पहिला तो अधिक मास आणि दुसरा तो नीज मास समजला जातो. दोन अधिक मासांत जास्तीतजास्त ३५ तर कमीतकमी २७ महिन्यांचा कालावधी जातो. यापूर्वी २०१२मध्ये भाद्रपद अधिक मास आला होता. या वर्षी आषाढ अधिक मास तर २०१८मध्ये ज्येष्ठ, २०२०मध्ये आश्विन, २०२३मध्ये श्रावण, २०२६मध्ये ज्येष्ठ तर २०२९मध्ये चैत्र अधिक मास येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक मासात दान देण्यास सांगितले आहे. आषाढ अधिक मास आला असताना कोकिळा व्रत करण्यास सांगितले आहे. गुरुवार, ३० जुलैपासून शनिवार, २९ आॅगस्टपर्यंत कोकिळा व्रत करावयाचे आहे. कोकीळ पक्ष्याचा आवाज ऐकून उपास सोडण्यास सांगितले आहे. असे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.