शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'मोदींनी बहिणींसाठी राखीची ओवाळणी दिली', सिलेंडरची किंमत कमी होताच फडणवीसांना आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 19:59 IST

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधानांचे आभारही मानले.

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (29 ऑगस्ट) घरगुती एलपीजी गॅस (LPG gas) सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, उज्जला योजनेच्या लाभार्थ्यांना या निर्णयातून 400 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. राखी पौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर देशातील सर्वच बहिणींना मोदी सरकारने ही ओवाळणी दिल्याचं म्हटलं जात आहे. तर, या निर्णयाचा संबंध निवडणुकीशी जोडत काँग्रेसने (Congress) केंद्र सरकारवर टीकाही केली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधानांचे आभारही मानले. ''पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, रक्षाबंधन सणाच्या पवित्र मुहूर्तावर देशातील बहिणींना त्यांना राखीची ओवाळणी दिली आहे. विशेषत: गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी करुन निश्चितच एक दिलासा दिलाय. तसेच, उज्ज्वला योजनेची सबसिडी आता ४०० रुपये असणार आहे. म्हणजेच गरीब भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे,'' असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आणि मोदींचे आभार मानले. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निश्चित सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेला याचा लाभ मिळणार आहे. मात्र, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येते. 

LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर

ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गंत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसची टीका

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव होणार याच्या धास्तीने पछाडल्यामुळेच गॅसचे दर कमी केल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या दोन बैठका झाल्या आणि आज केंद्र सरकारने LPG गॅसची किंमत 200 रुपयांनी कमी केली. ही आहे इंडिया आघाडीची ताकद.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCylinderगॅस सिलेंडरRaksha Bandhanरक्षाबंधनNarendra Modiनरेंद्र मोदी