शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:23 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. मनसे महायुतीत जाणार या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर कुणी कुणाबरोबर दिसल्याने आघाडी किंवा युतीचे ठरत नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांना शनिवारी पूर्णविराम दिला. 

राज म्हणाले, ‘विधान भवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नव्हते. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर वागतोय असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार.’ 

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने मनसेकडून चाचपणी केली जात आहे. 

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर आले होते.  शुक्रवारी कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले.अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात. मात्र, त्यांच्यासमोर जे राजकारण सुरू आहे, ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, असे राज म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या मराठा - ओबीसी वादाबाबत ते म्हणाले, ‘राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या, या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील, तर हे वाद कोणीतरी घडवतोय’, असा आरोपही त्यांनी केला.

महाराजांचे नाव न घेणाऱ्या पवारांना तुतारी शरद पवार यांच्यावर राज यांनी थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर केले.   पवारांनी महाराष्ट्रातील महापुरुष जातीपातींमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला? असा टोला राज यांनी लगावला.

गायकवाडांनी हे पाऊल का उचलले, ते शोधाभाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराकडे लक्ष वेधले असता राज म्हणाले की, ‘गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईल.’

राष्ट्रीय पक्षांना देणे-घेणे नाहीमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना याबाबत काही देणे-घेणे नाही. त्यासाठी राष्ट्रीय नव्हे, प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात, असे राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे