शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनसे महायुतीत जाणार नाही; राज ठाकरेंनी अखेर केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:23 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली :  महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू आहे. मनसे महायुतीत जाणार या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर कुणी कुणाबरोबर दिसल्याने आघाडी किंवा युतीचे ठरत नसते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांना शनिवारी पूर्णविराम दिला. 

राज म्हणाले, ‘विधान भवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत, हेच कळत नव्हते. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर वागतोय असंच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार.’ 

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने मनसेकडून चाचपणी केली जात आहे. 

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण- डोंबिवली दौऱ्यावर आले होते.  शुक्रवारी कल्याणमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी राज यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षचिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही त्यांनी भाष्य केले.अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात. मात्र, त्यांच्यासमोर जे राजकारण सुरू आहे, ते पाहून तरुण वर्ग राजकारणात येणार नाही, असे राज म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या मराठा - ओबीसी वादाबाबत ते म्हणाले, ‘राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या, या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील, तर हे वाद कोणीतरी घडवतोय’, असा आरोपही त्यांनी केला.

महाराजांचे नाव न घेणाऱ्या पवारांना तुतारी शरद पवार यांच्यावर राज यांनी थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाने तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर केले.   पवारांनी महाराष्ट्रातील महापुरुष जातीपातींमध्ये विभागून टाकलेत. आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला? असा टोला राज यांनी लगावला.

गायकवाडांनी हे पाऊल का उचलले, ते शोधाभाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबाराकडे लक्ष वेधले असता राज म्हणाले की, ‘गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईल.’

राष्ट्रीय पक्षांना देणे-घेणे नाहीमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना याबाबत काही देणे-घेणे नाही. त्यासाठी राष्ट्रीय नव्हे, प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले पाहिजेत, तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात, असे राज म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे