शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Shalini Thackeray : "सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:05 IST

MNS Shalini Thackeray And Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe)  यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

"सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!! सच हमेशा कडवा होता है.......!!!! मानो या न मानो....!!!!" असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आले. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विशेषत: अभिनेता प्रसाद ओक  (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावूक झाले होते. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शेवटच्या सीनमध्ये काय आहे?

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग कोणत्याही शिवसैनिकाला भावूक करणारा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रसंग पाहण्याचं टाळलं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.90 कोटी  रूपयांचा बिझनेस केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण