शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Shalini Thackeray : "सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 20:05 IST

MNS Shalini Thackeray And Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

मुंबई - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe)  यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

"सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!! सच हमेशा कडवा होता है.......!!!! मानो या न मानो....!!!!" असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आले. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विशेषत: अभिनेता प्रसाद ओक  (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावूक झाले होते. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

शेवटच्या सीनमध्ये काय आहे?

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग कोणत्याही शिवसैनिकाला भावूक करणारा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रसंग पाहण्याचं टाळलं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.90 कोटी  रूपयांचा बिझनेस केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण