शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:53 IST

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला.

पुणे – मनसे नेते अमित ठाकरे यांची कार अडवल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला. या घटनेवरून राज्यभरात पडसाद उमटले. भाजपाने या प्रकारावरून अमित ठाकरेंवर टीका करत थेट ही दादागिरी राज्यात खपवून घेणार नाही असा इशारा दिला. त्यावरून पहिल्यांदाच आता या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. अमितच्या कारला फास्टटॅग असूनही त्याला तिथे थांबवले गेले. सर्वकाही असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तिथले कर्मचारी कुणाशी तरी वॉकी-टॉकीवरून बोलत होते. समोरचा माणूस उद्धटपणे बोलत होता. त्यातून आलेली ती रिएक्शन आहे. तो राज्यभरात टोल फोडत चाललाय असं नाही. परंतु त्यापेक्षा भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला.

त्याचसोबत प्रत्येकवेळी टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात. हा कोणाचा लाडका आहे? ही टोलची प्रकरणे तरी काय आहे? समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना सदोष रस्ता बनवला. त्यामुळे आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार का? रस्ता सुरू करण्यापूर्वी टोल बसवताय. लोकांच्या जगण्यामरण्याची काळजी नाही. लोक गाडी चालवतायेत मरूदे असं धोरण आहे का असंही राज ठाकरेंनी भाजपाला सुनावले.

केंद्रात मराठी मंत्री अन् महाराष्ट्रातले रस्ते खराब

राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही. ६५ टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाले त्याचे कौतुक करणार नाही. पण जे टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देऊन सत्तेत आले त्यांना प्रश्न विचारणार नाही असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं.

...तोपर्यंत सरकार असेच मिळणार

सगळे निर्लज्ज आहेत. याचे कारण आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत परत त्यांनाच मतदान करायचे त्यामुळे सगळे असेच आहे. आम्ही ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला हे सांगितले आणि त्यांना पुन्हा त्यांनाच सरकारमध्ये घेणार. जोपर्यंत समाज असा आहे तोपर्यंत सरकार असेच वागणार आहे राष्ट्रवादीची पहिली टीम रवाना झाली, दुसरी टीम रवाना होईल हे मी आधीच सांगितले होते. आजही भेटीगाठी सुरू आहेत. शरद पवारांचे राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? हे सगळी मिलीभगत आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेtollplazaटोलनाका