शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

टोल तोडफोड प्रकरणी राज ठाकरेंचा भाजपावर हल्ला; "केंद्रात मराठी मंत्री पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:53 IST

भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला.

पुणे – मनसे नेते अमित ठाकरे यांची कार अडवल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला. या घटनेवरून राज्यभरात पडसाद उमटले. भाजपाने या प्रकारावरून अमित ठाकरेंवर टीका करत थेट ही दादागिरी राज्यात खपवून घेणार नाही असा इशारा दिला. त्यावरून पहिल्यांदाच आता या संपूर्ण प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, अमित ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. तो सगळीकडे टोल फोडत चाललाय असं नाही. एका टोल नाक्यावर हा प्रसंग घडला. अमितच्या कारला फास्टटॅग असूनही त्याला तिथे थांबवले गेले. सर्वकाही असल्याचे त्याने सांगितले. त्यावर तिथले कर्मचारी कुणाशी तरी वॉकी-टॉकीवरून बोलत होते. समोरचा माणूस उद्धटपणे बोलत होता. त्यातून आलेली ती रिएक्शन आहे. तो राज्यभरात टोल फोडत चाललाय असं नाही. परंतु त्यापेक्षा भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्त करू असं आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल राज यांनी केला.

त्याचसोबत प्रत्येकवेळी टोल म्हैसकर नावाच्या माणसाला मिळतात. हा कोणाचा लाडका आहे? ही टोलची प्रकरणे तरी काय आहे? समृद्धी महामार्गावर रस्ता बनवताना सदोष रस्ता बनवला. त्यामुळे आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला. याची जबाबदारी भाजपा किंवा सरकार घेणार का? रस्ता सुरू करण्यापूर्वी टोल बसवताय. लोकांच्या जगण्यामरण्याची काळजी नाही. लोक गाडी चालवतायेत मरूदे असं धोरण आहे का असंही राज ठाकरेंनी भाजपाला सुनावले.

केंद्रात मराठी मंत्री अन् महाराष्ट्रातले रस्ते खराब

राज्यात अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडी होते. अनेक तास ताटकळत राहावे लागतात. तुम्ही कसले टोल वसूल करताय? ही मनमानी सुरू आहे त्यावर भाजपा काय बोलणार का? १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होतोय. किती वर्ष चालणार? रस्ते बांधणीबाबत केंद्रातला मंत्री मराठी आहे आणि महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत यापेक्षा दुदैव नाही. ६५ टोलनाके मनसेच्या आंदोलनामुळे बंद झाले त्याचे कौतुक करणार नाही. पण जे टोलमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन देऊन सत्तेत आले त्यांना प्रश्न विचारणार नाही असंही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं.

...तोपर्यंत सरकार असेच मिळणार

सगळे निर्लज्ज आहेत. याचे कारण आपला समाज आहे. सगळ्या गोष्टी भोगून परत परत त्यांनाच मतदान करायचे त्यामुळे सगळे असेच आहे. आम्ही ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला हे सांगितले आणि त्यांना पुन्हा त्यांनाच सरकारमध्ये घेणार. जोपर्यंत समाज असा आहे तोपर्यंत सरकार असेच वागणार आहे राष्ट्रवादीची पहिली टीम रवाना झाली, दुसरी टीम रवाना होईल हे मी आधीच सांगितले होते. आजही भेटीगाठी सुरू आहेत. शरद पवारांचे राजकारण तुम्ही किती वर्ष बघताय? हे सगळी मिलीभगत आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMNSमनसेtollplazaटोलनाका