शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हा हा हा हा... 'त्या' प्रश्नावर राज ठाकरे फक्त 'मनसे' हसले; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:05 IST

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवे असा काहींमध्ये सूर आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे जाणार का असा प्रश्न विचारला असता ठाकरेंनी उत्तर देणे टाळले. त्या प्रश्नावर राज ठाकरे फक्त हसले ज्याचा व्हिडीओ मनसेने शेअर केला आहे.

राज ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर असून मनसेने ठाकरेंच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली आहे. तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेत आहेत. राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून उद्या ते दापोली आणि मंडणगडला जाणार आहेत. 

उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? राज ठाकरे म्हणाले...

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची टीका केली होती. पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भाजपवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईसह विविध भागात 'राज आणि उद्धव' यांनी एकत्र यावे असे पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकावले होते. 

राज ठाकरेंना दिलेला त्रास विसरणार नाही - अविनाश जाधवराज आणि उद्धव एकत्र येणार का? या प्रश्नावर दोन्हीही पक्षातील नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी 'मातोश्री'ने राज यांना दिलेला त्रास विसरणार नसल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेShiv Senaशिवसेना