शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:34 IST

राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत.बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो.महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्दा चर्चिला जात आहे. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा विधानसभेत पारित केला असा कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. 

या पत्रात राजू पाटील यांनी म्हटलंय की, आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू करुन देशात पहिलं राज्य बनण्याचा मान मिळविला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्यात कलम 354 मध्ये सुधारणा करुन बलात्कार आणि सामुहिक बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तपास व पुढील चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेवून एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशीसारखी शिक्षा देण्याची तरतूद असल्याचं सांगितले आहे. 

तसेच महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही, बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो. महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

तर याबाबत विधान परिषदेत माहिती देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर जबर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशासारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे, यासंदर्भात विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRapeबलात्कारWomenमहिला