शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:34 IST

राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत.बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो.महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्दा चर्चिला जात आहे. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा विधानसभेत पारित केला असा कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. 

या पत्रात राजू पाटील यांनी म्हटलंय की, आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू करुन देशात पहिलं राज्य बनण्याचा मान मिळविला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्यात कलम 354 मध्ये सुधारणा करुन बलात्कार आणि सामुहिक बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तपास व पुढील चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेवून एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशीसारखी शिक्षा देण्याची तरतूद असल्याचं सांगितले आहे. 

तसेच महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही, बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो. महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

तर याबाबत विधान परिषदेत माहिती देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर जबर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशासारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे, यासंदर्भात विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRapeबलात्कारWomenमहिला