शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:34 IST

राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत.बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो.महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महिला सुरक्षेच्या मुद्दा चर्चिला जात आहे. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वारंवार घडत आहेत. त्यामुळे बलात्कार पीडितेला न्याय देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा विधानसभेत पारित केला असा कायदा महाराष्ट्रात लागू करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली आहे. 

या पत्रात राजू पाटील यांनी म्हटलंय की, आंध्र प्रदेश सरकारने दिशा कायदा लागू करुन देशात पहिलं राज्य बनण्याचा मान मिळविला त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. या कायद्यात कलम 354 मध्ये सुधारणा करुन बलात्कार आणि सामुहिक बलात्कार अशा प्रकारचा गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या सात दिवसात तपास व पुढील चौदा दिवसात न्यायालयात जलद गतीने सुनावणी घेवून एकवीस दिवसाच्या आत दोषींना फाशीसारखी शिक्षा देण्याची तरतूद असल्याचं सांगितले आहे. 

तसेच महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास आणि सुनावणी सुरु असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक व वचक राहिलेला नाही, बलात्कार पीडितेला योग्य न्याय मिळण्यास मोठा कालावधी लागतो. महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशसारखा कठोर कायदा करण्याची वेळ आता आलेली आहे. राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

तर याबाबत विधान परिषदेत माहिती देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, राज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर जबर वचक बसावा, यासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशासारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहे, यासंदर्भात विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेRapeबलात्कारWomenमहिला